शिवाजीनगर पुलाचा निरोप केंद्राकडे

0

जळगाव। शहरातील शिवाजी नगर पुलाच्या बांधकामास 103 वर्षे उलटून गेले असून तो मोडकळीस आला आहे. महाड येथील सावित्री नदीवरील ब्रिटिशकालीन पूल कालबाह्य झाल्याने तेथे मोठी दुर्घटना घडली होती. मध्य रेल्वे मार्गावर शिवाजी नगर उड्डाण पुलाचे बांधकाम ब्रिटीशांनी 1913 साली केले आहे. या बांधकामास 103 वर्ष पूर्ण होत आहेत. या पुलाला 100 वर्ष पूर्ण झाल्याने या पुलाची आयुष्य मर्यादा संपली आहे. हा पुल केव्हाही कोसळू शकतो. तसेच यातून जीवितहानी होवू शकते असे ब्रिटिश सरकारने रेल्वे प्रशासनाला पत्राद्वारे आठवण करून दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवाजी नगर उड्डाणपुल उभारणी संदर्भांत रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्याशी व्हिडीओ कॉन्फसरिंगद्वारे 18 एप्रिल रोजी संवाद साधणार आहेत.

6 कोटी भरण्यासही महापालिकेची असमर्थता; निम्मा खर्च पेलण्यास रेल्वे तयार
राज्यातील रेल्वे संदर्भांत मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस व रेल्वे मंत्री सुरेश प्रभु यांची व्हिडाओ कॉन्फरेसिंगद्वारे 18 एप्रिल रोजी चर्चा होणार आहे. दरम्यान, या पुलासाठी 20 कोटी रुपयांचा खर्च प्रस्तावात दाखविण्यात आला आहे. रेल्वे हद्दीतील बांधकामासाठी रेल्वेने महापालिकेला 6 कोटी 26 लाखांची मागणी केली आहे. निधीअभावी या कामांना ब्रेक बसला आहे. यात 14 कोटी रूपयांत रस्त्यांची कामे करण्यात येणार आहे. हा रेल्वेतर्फे संपूर्ण खर्च महानगर पालिकेला करण्याचे सांगण्यात आले आहे. परंतु,आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने हा खर्च महानगर पालिकेला पेलावण्यास असमर्थ असल्याचे प्रशासनाने रेल्वे प्रशासनाला कळविले आहे. हा खर्च रेल्वेने 50 टक्के व पीडब्लुडीने 50 टक्के करावा असा प्रस्ताव मनपाने ठेवला आहे. याप्रस्तावास रेल्वे प्रशासनाने सकारात्मकता दाखविली आहे. यामुळे शिवाजी नगर उड्डाणपुलाचा प्रश्‍न मार्गी लागण्याचे चिन्ह दिसत आहे.

अर्ध्या शहराचा दुवा
मुख्यमंत्र्यांच्या रेल्वे मंत्र्यांच्या चर्चेंत शहरातील शिवाजी नगर उड्डाणपुलाबाबत सकारात्मक निर्णय होण्याची चिन्ह दिसत आहेत. रेल्वेतर्फे सुरत लाईनच्या विस्तराचे सुरू आहे. तरी हा खर्च रेल्वेने करावा असा प्रस्ताव देण्यात आला आहे. शहरातून जाणार्‍या रेल्वे मार्गामुळे शिवाजीनगर गेंदालाल मिल परिसर, दाळफळ परिसर हा रेल्वे मार्गाच्या उत्तरेकडील भाग, पिंप्राळा परिसर, मुक्ताईनगर, प्रेम नगर, भोईटे नगर, निमखेडी परिसर हा अतिशय मोठा परिसर रेल्वे मार्गाच्या पलिकडे असलेला भाग आहे. शहरात दळणवळण करणारी बरीच वाहतूक पिंप्राळा रेल्वे गेटकडून शिवाजी नगर पुलाकडे होत असते.