शेंदूर्णी: पावसाळा सुरू होण्यापूर्वी नदीवरील सर्व फरशी पुलाचे काम पूर्ण होणार असल्याचा दावा नगरपंचायततर्फे करण्यात आला आहे. नगराध्यक्षा विजया खलसे, उपनगराध्यक्ष चंदाताई अग्रवाल यांनी पावसाळ्या पूर्वी कामे पूर्ण करण्यास प्राधान्य दिले आहे. नगरपंचायतकडून अडीच कोटींचे विविध विकास कामे मंजूर करण्यात आले असून त्यात गावातील वाढीस वस्त्यांमध्ये रस्ते काँक्रीटीकरण, गटार बांधकाम तर गावातील मुख्य रस्त्यावर पेव्हर बसविण्याचे काम प्रगती पथावर आहे.
गावातील खळवाडी भागात नदीवर ३० पाईपचा फरशी पूल बांधण्यात आला आहे तर मोची वाडा मेणगाव रस्त्यावर ५४ पाईपचा फरशी पूल बांधण्यात येणार आहे. लवकरच बारी स्मशानभूमीचे कामालाही सुरवात करण्यात येणार आहे असे नगराध्यक्षा विजया अमृत खलसे, उपनगराध्यक्षा चंदाबाई अग्रवाल ,मुख्याधिकारी साजिद पिंजारी यांनी सांगितले . गावातील सर्वच व विकास कामे पूर्ण करण्यासाठी सहकारी सर्वच नगरसेवक, नगरसेविकांनी लक्ष घातले असून नगरसेवक निलेश थोरात,शरद बारी,राहुल धनगर,सतिष बारी,आलीम तडवी,श्रीकृष्ण चौधरी,शाम गुजर,गणेश पाटील यांच्यासह सर्व नगरसेवकांनी लक्ष घातले आहे.