यावल : तालुक्यातील साकळी येथील श्री स्वामी समर्थ अॅग्रो एजन्सीजचे संचालक अजय पाटील (पिळोदेकर) यांनी कोरोना विषाणू वैश्विक महामारी संकट लक्षात घेता साकळी व पंचक्रोशीतील शेतकर्यांसाठी त्यांच्या मागणी नुसार थेट शेताच्या बांधावर किटकनाशके व कृषी मार्गदर्शन इत्यादी सेवा देणारा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमात शेतकरी बांधवांना दुकानावर न जाता मोबाईल द्वारे विविध बियाणे यांची ऑर्डर बुक करून दुकानदारांमार्फत बी-बियाणे व इतर संबंधित सुविधा पाटील यांच्या मार्फत थेट शेताच्या बांधावर अथवा घरपोच दिली जाणार आहे. या उपक्रमास शेतकरी वर्गाकडून चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. त्याचप्रमाणे शेतकरी बांधवांनी आपण शेतीसाठी लागणारे कीटकनाशके सुद्धा थेट आपल्या घरी मागवून घेता येणार आहे यासाठी तसेच राज्य सरकारचा आदेश आल्यावर बी बियाणे पण थेट शेतकर्या च्या घरी पोच करण्याची सुविधा सुरू करणार आहे. शेतकरी बांधवांनी सुरक्षित राहून काळजी घ्यावी, पाटील यांनी कळवले आहे.