औरंगाबाद : परतीच्या अवकाळी पावसाने राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आज रविवारी ३ रोजी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नुकसानीची पाहणी करण्यासाठी औरंगाबाद दौऱ्यावर होते. शेतकऱ्यांना सरकारने जाहीर केलेली मदत तुटपुंजी आहे. सरकारने शेतकऱ्यांना तातडीने प्रति हेक्टर 25 हजार रुपये मदत जाहीर करावी, अशी मागणी यावेळी उद्धव ठाकरेंनी केली.
नुसती कागदी घोडे नाचवू नका असा इशाराही त्यांनी सरकारला दिले आहे. शेतकऱ्यांना मदत करताना कोणत्याही अटी नसाव्यात, अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली.
सरकारकडून 10 हजार कोटींच्या मदतीचे निर्देश प्रशासनाला दिले असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिली. अवकाळी पावसातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारकडून 10 हजार कोटींची मदत करणार असल्याचे ते म्हणाले. प्रशासनाकडून पंचनामा न होऊ शकल्यास शेतकऱ्यांनी नुकसानीचा फोटो काढून जरी पाठवला तरी ग्राह्य धतले जाईल. मदतीचे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जाणार आहे, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.