शेतीव्यवसायाच्या प्रसिद्धीसाठी बॉलिवुडच्या सेलिबे्रटींना निमत्रंंण

0

मुंबई। सर्वसामान्यांना चित्रपट कलावंतांचे असलेले आकर्षण लक्षात घेवून बळीराजाच्या शेती व्यवसायाला पूरक व्यवसायांना चालना देण्याचा निर्णय घेताना फडणवीस सरकारने याकामी बॉलिवुडच्या सेलिब्रिटींनाही या मोहिमेत सहभागी करून घेण्याचा निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्रातील विविध योजनांच्या प्रमोशनसाठी बॉलिवुड जगतातील मोठ्या चेहर्‍यांना आमंत्रण दिले जाणार आहे. शेतकर्‍यांना शेतकी व्यवसायात बस्तान बसवता यावे म्हणून सहकार्य करण्यासाठी अक्षय कुमार, शाहरुख यासारख्या सेलिबे्रटींना पाचारण करण्याची तयारी फडणवीस सरकारने सुरू केली आहे.

विशेषतः पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्यविकास मंत्रालयाच्या योजनांच्या प्रसिद्धीसाठी सुपरस्टार्सची मदत घेतली जाणार आहे. शाहरुख खान, अक्षय कुमार, कतरिना कैफ, प्रियांका चोप्रा, ऐश्वर्या राय यासारख्या सुप्रसिद्ध बॉलिवूड कलाकारांचा यात समावेश असेल. अनेकांना पत्र लिहून विचारणा करण्यात आली असून त्यांचा सकारात्मक प्रतिसाद आल्याचे जानकर म्हणाले.

शेतकर्‍यांना स्वावलंबी करण्यासाठी जानकरांनी शाहरुख खान आणि इतर काही कलाकारांना योगदान देण्याची विनंती केली आहे. प्राण्यांसाठी मोबाईल व्हॅन्स, भटक्या कुत्रे आणि मांजरींसाठी लसीकरण, देशी गायींसाठी निवारा, ग्रामीण आणि आदिवासी भागातील महिलांसाठी उद्योग योजना यांसारखे प्रकल्प सुरू करण्याची पदुम मंत्रालयाची तयारी आहे.

अक्षयची जमिन खरेदी
ज्याप्रकारे अक्षयकुमारने शहीद जवानांसाठी अ‍ॅप सुरु करुन आर्थिक मदत जमा केली, त्याप्रमाणे शेतकर्‍यांनाही आर्थिक साहाय्य करावे, असे जानकर म्हणाले. अक्षयने आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या विधवांना मदत केल्याचे आणि भूमिहीन शेतकर्‍यांना सेंद्रिय शेती करता यावी, म्हणून मुंबईजवळ 5 एकर जमीन खरेदी केल्याचेही जानकरांनी सांगितलं.