संभाजी ब्रिगेडनी केली निवडणुक लढण्याची घोषणा

0

मुंबई : संभाजी ब्रिगेडने राज्यात निवडणुक लढण्याची घोषणा केली असून औरंगाबादमध्ये ९ डिसेंबरला स्वराज्य संकल्प मेळावा आयोजित केला असल्याची माहिती ब्रिगेडचे महाराष्ट्र संघटक कपिल डोके यांनी दिली. मुंबई मराठी पत्रकार संघात शुक्रवारी (30 नोव्हेंबर) रोजी पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.

राज्यातील सत्ताधारी किंवा विरोधकांना शेतकऱ्यांच्या आत्महत्या दिसत नाहीत. मेलेल्या वाघिणीच्या विषयावर राजकारण होते, मात्र स्वतःचे सरण रचून आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांवर चर्चा करण्यासाठी प्रस्थापित पक्षांकडे वेळ नाही असं डोके यांनी म्हटलं आहे. तरूणांच्या रोजगाराऐवजी शहरांचे नावे बदलण्यात सरकार व्यस्त आहे. म्हणूनच पुरोगामी महाराष्ट्रात जनतेसाठी संभाजी ब्रिगेड हा सक्षम पर्याय असल्याचा दावा ढोके यांनी केला आहे.

संभाजी ब्रिगेडने लोकसभेच्या ३० जागा आणि विधानसभेच्या १०० जागा लढणार असल्याचे स्पष्ट केले आहे. राज्यातील बऱ्याच मतदार संघात स्वबळावर लढण्याची तयारी आहे. समविचारी पक्षांशिवाय कोणत्याही प्रस्थापित पक्षासोबत जाणार नसल्याचे ब्रिगेडने स्पष्ट केले आहे.