मुंबई । राज्यात संरक्षित सिंचनाची व्यवस्था वाढण्यासाठी येत्या दोन महिन्यात जलयुक्त शिवारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कामे व्हावी. यासाठी सर्व पालकमंत्र्यांनी जिल्हास्तरावर तातडीने बैठका घेऊन आवश्यक ते नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. राज्य जल परिषदेची तिसरी बैठक आज मंत्रालयात मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, राज्याचा एकात्मिक जल आराखडा तयार करताना सर्व खोर्यांचे एकत्रीकरण करण्यात यावे. गोदावरी खोर्याच्या एकात्मिक जल आराखड्यानुसार राज्यातील इतर खोर्यांचे जल आराखडे तयार करण्याच्या दृष्टीने कालबध्द नियोजन करावे जल आराखड्यास राज्य जल परिषदेची मान्यता घेण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी जेणेकरून सर्व खोर्यांचे जल आराखडे समान पातळीवर व एकात्मिक राहतील, या कामांच्या माध्यमातून राज्यात संरक्षित सिंचनाची व्यवस्था वाढण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत,असेही निर्देश दिलेत.
निवासी चाळीसंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आढावा बैठक
मुंबई । बृहन्मुंबईतील निवासी चाळीसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रालयात आढावा घेऊन गिरण्यांच्या जागेवरील चाळींच्या पुनर्विकासाच्या प्रश्नांवर अधिकार्यांशी चर्चा केली. पूर्वीच्या पुनर्विकास आराखड्याप्रमाणे चाळकर्यांना दिलेल्या जागेत वाढीव जागा देण्याबाबत या बैठकीत विचारविनिमय करण्यात आला. याावेळी अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी नगरविकास राज्यमंत्री डॉ.रणजीत पाटील, आमदार आशिष शेलार, कालिदास कोळंबकर, सुनिल शिंदे, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर, बृहन्मुंबई महापालिका आयुक्त अजोय मेहता आदींसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बैठकीस यांची होती उपस्थिती
बैठकीस महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, परिवहन मंत्री दिवाकर रावते, कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, मुख्य सचिव सुमित मल्लिक, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव आय.एस.चहल, सचिव शि. मा. उपासे, गृह विभागाचे माजी अपर मुख्य सचिव के.पी.बक्षी यांच्यासह जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.