सचिनचा अपमान करायचा हेतू नव्हता!

0

मुंबई। शेतकर्‍यांचे प्रश्‍न सरकारपुढे मांडताना आमदार बच्चू कडू यांनी नांदेडमध्ये हेमा मालिनी याच्याबद्दल त्यानंतर सचिन तेडूलकर यांच्या वादग्रस्त विधान केले होते. नांदेडातील वाद थांबत नाही तोच मास्टर ब्लास्टर सचिन तेडुलकर याच्या घसरले होते. त्यांनी सचिनची कबुतराशी तुलना केली होती. मात्र त्यांनतर आमदार बच्चू कडू यांनी सचिन तेडूलकर प्रकरणी सारवासारव केली आहे. ’सचिन तेंडुलकर याच्या धावांबाबत मी केलेले वक्तव्य शेतकर्‍यांच्या समस्यांच्या अनुषंगाने होते. त्यामागे सचिनला अपमानित करण्याचा हेतू नव्हता. माझ्याकडून तसे होणारही नाही,’ असे स्पष्टीकरण आमदार बच्चू कडू यांनी दिले आहे.

’कडू’ वाणीवर सर्वच स्तरांतून टीकेची झोड
शेतकरी आत्महत्येच्या मुद्द्यावरून सरकारविरोधात संताप व्यक्त करताना सचिनवर घसरले होते. ’सचिन तेंडुलकरचे रन मोजणारे गल्लीपासून दिल्लीपर्यंत आहेत. पण या बांधापासून त्या बांधापर्यंत आयुष्यभर पायपीट करणार्‍या माऊलीचे, शेतकर्‍यांचे रन मोजायला कुणीच नाही, याचे दुःख आहे. सचिनचे रन मोजू नका. ते कबुतर मेले काय, राहिले काय’, अशा अत्यंत कडवट्ट शब्दांत बच्चू कडू यांनी राग व्यक्त केला होता. ’इथून चौका आणि तिथून छक्का कुणालाही मारता येईल. पण याला एवढं डोक्यावर घेतलंय, असे वाटतेय की पाकिस्तान जिंकून आलंय’, असेही हे म्हणाले होते. बच्चू यांच्या या ’कडू’ वाणीवर सर्वच स्तरांतून टीकेची झोड उठली होती. या टीकेमुळे बॅकफूटवर गेलेल्या कडू यांनी यावर खुलासा केला आहे. ’शेतकर्‍यांच्या व्यथा, वेदना मांडण्याच्या अनुषंगाने मी ते वक्तव्य केले होते. सचिनचा अपमान करण्याचा माझा हेतू नव्हता,’ असे त्यांनी म्हटले आहे.