औरंगाबाद । बहुचर्चित मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला शेतकर्यांचा प्रचंड विरोध होत आहे. औरंगाबादमध्येही शेतकर्यांच्या विरोधाची धार वाढली आहे. जमिनीची मोजणी करण्यास विरोध करत औरंगाबाद जिल्ह्यातील कच्चीघाटी शिवारात शेख कालू या शेतकर्याने आत्महत्येचा प्रयत्न केला.
घटनास्थळी मोठ्या संख्येने नागरीक असल्याने मोठा अनर्थ टळला. ठिकठिकाणी जमीन मोजणीचे काम सुरू आहे. औरंगाबादमधील शेतकर्यांनीही जमीन मोजणीला विरोध केला आहे. सहमतीशिवाय जमीन मोजणी केली जात असल्याने औरंगाबाद जिल्ह्यातील कच्चीघाटी शिवारात शेख कालू या शेतकर्याने आत्महत्येचा प्रयत्न केला.