सरकारकडून अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी

0

मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांचे स्पष्टोक्ती

उस्मानाबाद : देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होत आहे. पुरस्कार वापसी हे टोकाचे पाऊल आहे. कलाकार, साहित्यीकांना व्यक्त होता आले पाहिजे. कलावंताच्या अभिव्यक्तीमध्ये कोणताही अडथळा येऊ नये, असे स्पष्ट मत बडोदा येथे होणार्‍या 91 व्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुखांनी यांनी व्यक्त केले. उस्मानाबादमध्ये रविवारी झालेल्या मराठवाडा साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

घटना बदलणे अशक्य
अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि संस्कृतीबाबत मोदी आणि फडणवीस सरकारची काही धोरणे चुकल्याचेही ते म्हणाले. देशभरात गोरक्षेच्या नावाखाली कथित गोरक्षकांकडून होणार्‍या हल्ल्यांवरुन देशमुख यांनी मोदी सरकारवर टीका केली. साहित्य संमेलनात राजकारण्यांनी हस्तक्षेप करुन नये, असा रोखठोक सल्लाही त्यांनी दिला. आधीच्या सरकारमध्ये आणि या सरकारमध्ये कोणताही फरक नाही. घटना बदलण्याचा प्रयत्न सनसनाटीपणाचा आहे. घटना बदलणे शक्य नाही. सध्या वातावरणात तणाव दिसतो, पण अभिव्यक्तीला दडपण्याचा प्रयत्न सर्वच सरकारकडून केला जातो, असेही देशमुख म्हणाले.