मुंबई-बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली, यावेळी न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे. संपाबाबत दाखल याचिकेवर उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयाने सर्वसामान्यांना वेठीस धरणे चुकीचे असल्याचे सांगत बेस्ट कर्मचाऱ्यांना सुनावले आहे. संपावर कायम राहून तडजोडीची चर्चा करणे योग्य नाही असेही उच्च न्यायालायने यावेळी कर्मचाऱ्यांना सांगितले. दरम्याम महाधिवक्ता गैरहजर असल्याने सुनावणी दुपारी तीन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आली आहे.
उच्च न्यायालयाने संपावर नाराजी व्यक्त करताना तुम्हाला नेमक काय हवे आहे. तुम्हाला चर्चा करायची नाही आणि संपही मागे घ्यायचा नाही अशी विचारणा केली. राज्य सरकारने याप्रश्नी उच्चस्तरीय त्रिसदस्यीय समिती नेमून त्याआधारे मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, उच्चस्तरीय समिती आणि कृती समितीमध्ये झालेल्या बैठकीतून काहीही निष्पन्न झाले नाही. संपाबाबत न्यायालय कोणते आदेश देते याकडे कामगार संघटनांसह सर्वाचेच लक्ष लागले आहे.