साखर कारखान्यावरील कर्ज वाचवण्यासाठीच कर्जमाफी: चंद्रकांत पाटील

0

मुंबई: राज्य सरकारने कर्जमाफीची घोषणा केली असून, ही कर्जमाफी फसवी असल्याचा आरोप भाजपाचे नेते तथा माजी महसुलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फसवत आहे असेही त्याणीस सांगितले. काँग्रेस नेत्यांच्या साखर करखान्यावरील जे दोनशे कोटीच कर्ज आहे ते वाचविण्याकरता ही कर्जमाफी केली गेली असल्याचा आरोप भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

यापूर्वीच्या सरकारने कर्ज माफ केली आहे. त्यामुळे ही सरसकट कर्जमाफी नसल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. नागपूरच्या अधिवेशनातही आम्ही शेतकरी कर्जमाफीची मागणी लावून धरली होती. राष्ट्रपती राजवट असताना राज्यपालांनी जी घोषणा केली होती तशीच ही योजना आहे. त्यामध्ये कोणतीही वाढ करण्यात आली नाही. त्या मागणीकडे दुर्लक्ष व्हावं म्हणून कर्जमाफी घोषित केली. सातबारा कोरा करू, मला शेतकऱ्यांचे अश्रू पुसायचे आहेत, असंदेखील उद्धव ठाकरे म्हणाले होते, याचीही त्यांनी आठवण करून दिली.

२००१ ते २०१६ पर्यंतची दीड लाखांची कर्जमाफी याधीच्या सरकारनं केली. त्यावेळी कर्जमाफीला निकष लावले म्हणून आरडाओरड करण्यात आली होती. परंतु आतादेखील करण्यात आलेल्या कर्जमाफीला निकष लावण्यात आले आहेत. सरसकटमध्ये निकष कसे येतील? निकष लावणं आवश्यक आहेच. पण आम्ही लावले तेव्हा ते चुकीचे होते आणि आता ते बरोबर आहेत. २००१ ते २०१६ या कालावधीतली दीड लाखांपर्यंतच संपूर्ण कर्जमाफी झाली आहे. जो राहिला तो तांत्रिक कारणांमुळे राहिला आहे, असंही त्यांनी सांगितलं.