नवी दिल्ली-जम्मू-काश्मीर आणि दहशतवाद या विषयावरून भाजप आणि कॉंग्रेसमध्ये नेहमी वाकयुद्ध सुरु असते. एकमेकांवर या प्रश्नांवरून आरोप-प्रत्यारोप केले जाते. दरम्यान भाजपने सत्तेत आल्यापासून साडेचार वर्षात ६४६ दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे असा दावा माहिती व तंत्रज्ञानमंत्री रवीशंकर प्रसाद यांनी केला आहे. तर केवळ राजकारण करणाऱ्या कॉंग्रसच्या काळात दोन वर्षात फक्त १३९ दहशतवादी मारले गेले. यावरून युपीए आणि एनडीए सरकारच्या कामकाजाचा अंदाज येतो असा टोलाही त्यांनी कॉग्रेसला लगावला आहे. याबाबत ट्वीटरवर त्यांनी माहिती दिली आहे.
Number of terrorists killed in Jammu & Kashmir:
In 2012- 72
In 2013- 67
In 2014- 110
In 2015- 108
In 2016- 150
In 2017- 217
In 2018 (till May)- 75
This is the story of efforts made during UPA and NDA regimes to fight terrorism in J&K. pic.twitter.com/qrVWiY6y49— Ravi Shankar Prasad (@rsprasad) June 22, 2018
वर्ष निहाय माहिती
२०१२ मध्ये कॉंग्रेस सरकार असतांना ७२ दहशतवादी मारले त्यानंतर २०१३ मध्ये ६७, दरम्यान भाजप सरकार आल्यानंतर २०१४ मध्ये ११०, २०१५ मध्ये १०८, २०१६ मध्ये १५०, २०१७ मध्ये २१ आणि आता २०१८ मध्ये आज पर्यंत ७५ दहशतवादी मारले गेले आहे अशी माहिती रवीशंकर प्रसाद यांनी दिली आहे.