सातपुड्यातील प्रेक्षणीय स्थळे विकासाअभावी पर्यटकांसाठी ठरताय जीवघेणे

0

तळोदा । सातपुड्यातील निसर्ग सौदर्य तरुणाईला वेड लावणार असून तळोदा,अक्कलकुवा,धडगांव तालुक्यातील अनेक दुर्गम स्थळ आहेत. जिल्ह्यात सुट्टीचा दिवस विरंगुळाचे ठिकाण तोरणमाळ सोडल्यास दिसून येत नाही. त्यामुळे पावसाळ्यात सातपुड्याच्या पर्वतराजीत कोसळणार्‍या पावसामुळे ठीकठिकणी छोटे मोठे धबधबाचा ठिकाणी उत्साही तरुण दरवर्षी जात असतात. मात्र या ठिकाणी पर्यटन स्थळ घोषित झालेले नाही. यापैकी वाल्हेरी हे ठिकाण विकसित होण्याकरिता निधी मंजूर असून अजून कामाला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे सातपुड्यातील यासारख्या अनेक दुर्गम स्थळी रस्ते,वीज,व कोणत्याही सुरक्षेच्या दृष्टीकोनातून कोणतेही सूचना फलक नाही.त्यामुळे नेमक धबधबा कुठं किती खोल आहे,याचा अंदाज येत नाही.

मानधनावर स्थनिक माहितगार सुरक्षा रक्षक ठेवावा
उत्साही तरुण मात्र यापैकी कोणतेही माहिती स्थानिक नागरीकांकडून न घेता तारुण्याच्या उत्साहात धोकेदायक जागेवर वावरताना दिसतात. यामुळे निदान पावसाळ्यात तरी इथे मानधनावर स्थनिक माहितगार सुरक्षा रक्षक ठेवावा अशी मागणी होत आहे.याबाबत गंभीर दखल प्रशासनाने घ्यावी अशी मागणी वेळोवेळी होते. मात्र या सर्व स्थळाना जर पर्यटन विभागाकडून जर निधी उपलब्ध झाला तर निश्चितच हे ठिकाणे अल्पावधीत प्रसिद्धीस येतील.याबद्दल पर्यटन विभागाने लक्ष द्यावे अशी येथील स्थानीक रहिवाश्यांची मागणी आहे.यामुळे इथे काही काळासाठी रोजगार उपलब्ध होईल.

प्रेक्षणीय व धोकेदायक स्थळ
तळोदा तालुक्यातील वाल्हेरी हे स्थळ 17 कि.मी.अंतरावर असून याठिकाणी दोन धबधबे आहेत याठिकाणी जिल्ह्यातून व गुजरात राज्यातून तरुण पर्यटक येत असतात. समाधानकारक पाऊस झाल्यास हे पाणी ऑक्टोबरच्या मध्यपावेतो टिकून असते.या ठिकाणी देखील अनेकांचे जीव गेले आहेत.मागील वर्षी तळोदा शहरातील दोन तरुण व्यापारी आपल्या इतर मित्रासोबत वनभोजनासाठी गेले होते. मात्र याठिकाणी त्यांचा बुडल्याने दुर्देवी अंत झाला होता. याअगोदर देखील 4 ते 5 तरुणाचा जीव याठिकाणी गेला आहे.

बिलगावातील बारा मुखी धबधबा
धडगांव तालुक्यातील बिलगावं हे गाव दुर्गम भागात असून धडगांवपासून जवळच आहे. याठिकाणी देखील दरवर्षी तळोदा शहादा तालुक्यातील तरुण पावसाळी पर्यटन म्हणून जात असतात. यंदा देखील असेच तळोद्यातील सात तरुण फिरण्यासाठी आले असता दोन सख्ये भाऊचा यात दुर्देवी अंत झाला.अश्या घटनांची पुनरावृत्ती टाळ्याची असल्यास आवश्यक ती काळजी घेणे गरजेचे आहे या बाबत पालकमंत्री या नात्याने पर्यटन मंत्री जयकुमार रावळ यांनी लक्ष घालून सातपुड्यातील निसर्गस्थळांना निधी मिळवून विकास करावा अशी अपेक्षा पर्यटन प्रेमी करून व्यक्त होत आहेत.

मयतांच्या नातेवाईकांना मदत नाही
धडगाव तालुक्यातील अतिदुर्गम भागातील बिलगाव येथील बारामुखी धबधबा पाहण्यासाठी गेलेल्या तळोदे शहरातील दोन सख्खे भाऊ, राहुल देविदास पाटील व विशाल देविदास पाटील यांचा पाण्यात बुडून मरण पावल्याची दुर्घटना घडून वर्ष झाले तरी अजूनही त्याचा कुटूबीयांना मुख्यमंत्री सहायता निधीतून नुकसान भरपाई मिळालेली नाही.दरम्यान गेल्यावर्षी शहादा तालुक्यातील एका तरुणाचा गेल्या वर्षी असेच ललिंग तलावात बुडून दुर्देवी मृत्यू झाला होता त्याच्या कुटूंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून एक लाखाचा धनादेश देण्यात आला.