मुंबई। कर्मचार्यांच्या पदनिहाय वेतनवाढीला एसटी प्रशासन तयार आहे. मात्र, मान्यताप्राप्त संघटना सातवा वेतन आयोग लागू करा, अशी अवास्तव मागणी करून कर्मचार्यांच्या पदनिहाय वेतनवाढीला आडकाठी करत असल्याचे एसटी प्रशासनाचे म्हणणे आहे.प्रशासन आणि मान्यताप्राप्त महाराष्ट्र एसटीकामगार संघटना यांच्यात 1 एप्रिलपासून कामगारांच्या वेतनवाढीसाठी प्रस्ताव सादर करून त्यावर चर्चा करण्यात आली.
गाडी हळू चालवा
मान्सून काळात चालकांनो एसटी हळू चालवा, असे आवाहन एसटी प्रशासनाने केले आहे.पुलाच्या फरशीवरुन सुरक्षित पातळीच्यावर पाणी असल्यास एसटी पुढे नेऊ नये, अशा सूचना केली आहे.सावित्री पुलावरील दुर्घटनेनंतर एसटी प्रशासनाने आपत्कालीन व्यवस्था अधिक सक्षम करण्याचे आदेश दिले होते.
3 मे पासून वाटाघाटी थांबल्या
प्रशासन नियुक्त वाटाघाटी समितीनुसार ही चर्चा सुरू होती. मात्र, मान्यताप्राप्त संघटना कर्मचार्यांसाठी सातवा वेतन आयोग लागू करा, या मागणीवर ठाम आहे. परिणामी, 3 मे पासून वाटाघाटी चर्चा थांबल्याचे प्रशासनाने सांगितले. शासकीय कर्मचारी व सार्वजनिक उपक्रमांतील कर्मचारी यांचे समानीकरण होऊ शकत नसल्याचा निष्कर्ष समितीने दिला आहे. त्यामुळे वेतनश्रेणीतील सुधारणांबाबत ठोस प्रस्ताव द्यावा, असे मान्यताप्राप्त संघटनेला सांगण्यात आले होते. त्याचबरोबर राज्य मार्ग परिवहन महामंडळाने कर्मचार्यांना कधीही वेतन आयोगाप्रमाणे वेतनवाढ दिलेली नाही, ही बाबही या वेळी निदर्शनास आणून दिली.