नवी दिल्ली: आपल्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत राहणाऱ्या भाजपा खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी आज सोमवार पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. भाजपातील वर्षभरात झालेल्या दिग्गज नेत्यांच्या निधनामागे वेगळेच कारण असल्याचे अजब-गजब दावा केला आहे. विरोधकांकडून मारक शक्तीचा प्रयोग केला जात असल्याने भाजपा नेत़्यांचे निधन झाल्याचा अजब दावा त्यांनी केला आहे. या विधानामुळे पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. भोपाळमध्ये मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री बाबूलाल गौर यांच्या श्रद्धांजली सभेत साध्वी प्रज्ञासिंह यांनी विरोधकांवर गंभीर आरोप केले आहेत.
“एकदा एका आध्यात्मिक महाजारांनी मला सांगितले होते की, सध्या भाजपाचा वाईट काळ सुरु असून यामागे विरोधकांचा हात आहे. विरोधकांकडून भाजपाविरोधात मारक शक्तीचा प्रयोग केला जात आहे. महाराजांनी सांगितलेली ही बाब मी नंतर विसरुन गेले. त्यानंतर आता आमचे वरिष्ठ नेते एकामागून एक हे जग सोडून जात असताना मला त्या महाराजांच्या विधानावर विचार करायला भाग पाडले आहे.” असे त्या म्हणाल्या.