नवी दिल्ली: नागरिकता संशोधन कायदा अर्थात सीएएच्या समर्थनात आज मंगळवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लखनौ येथे सभा घेतली. या सभेत त्यांनी हा कायदा कोणत्याही परिस्थितीत मागे घेणार नसल्याचे विरोधकांना खडसावून सांगितले. ‘भारता माता की जय’चा जयघोष करत शाह यांनी देशात सीसीए कायद्यावरून होणाऱ्या हिंसेला विरोधी पक्ष जबाबदारी असल्याचे सांगितले. नागरिकता कायद्यामुळे मुस्लिमांचे नागरिकत्व रद्द होईल असे गैरसमज पसरवले जात आहेत. ममता दीदी, राहुल बाबा, अखिलेश यादव तुम्ही चर्चा करण्यासाठी सार्वजनिक ठिकाण शोधून ठेवा. आमचा स्वतंत्र देव चर्चा करण्यासाठी तयार असल्याचे शाह यांनी विरोधकांना ठणकावून सांगितले.
सीसीएमधील एकही कलम एखाद्या मुस्लीम, अल्पसंख्यांकाची नागरिकता घेत असेल तर मला कळवावे, असे आवाहन शाह यांनी केले आहे. यावेळी शाह यांनी जेएनयूच्या मुद्दावर आपले मत मांडले. दोन वर्षांपूर्वी जेएनयूमध्ये देशविरोधी नारेबाजी करण्यात आली. भारताचे हजार तुकडे करण्याची इच्छा ठेवणाऱ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कारागृहात टाकले. मात्र राहुल गांधी यावर म्हणतात की, विद्यार्थ्यांना बोलण्याचे स्वातंत्र आहे.