डॉ.विश्वास पाटील : भुसावळातील पु.ओ.नाहाटा महाविद्यालयात एक दिवसीय राष्ट्रीय परीषद उत्साहात
भुसावळ : राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या मूल्यांचा जीवनात अनन्य साधारण महत्व आहे. त्यांचे विचार जीवनाला खूप महत्व देतात. गांधी विचार हे राजकारण,अ र्थकारण, शैक्षणिक व साहित्य क्षेत्रात महत्वाची भूमिका निभावताना दिसतात.ईश्वर सत्य आहे की नाही हे माहित नाही पण सत्य ईश्वर आहे. आज आपण आपला पैसा शस्त्रावर खर्च करायचा की शिक्षणावर हा जगासमोर प्रश्नच असून चारीत्र्याशिवाय शिक्षण व तत्वाशिवाय राजकारण पापच असल्याचे विचार बीजभाषक व सुप्रसिद्ध गांधी विचारवंत प्राचार्य डॉ.विश्वास पाटील (शहादा) यांनी येथे व्यक्त केले. भुसावळ कला, विज्ञान व पु.ओं.नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात मानव्यविद्या शाखांतर्गत महात्मा गांधींच्या 150 व्या जयंती वर्षानिमित्त ‘महात्मा गांधींच्या विचारांची समर्पकता’ या विषयावर मंगळवार, 4 फेब्रुवारी रोजी एक दिवसीय राष्ट्रीय परीषदेत ते बोलत होते.
परीषदेत चार खंडांचे प्रकाशन
परीषदेत केंद्रस्थानी ठेवलेल्या महात्मा गांधीजींच्या विचारांनी प्रभावीत विविध विषयांवर महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरील संशोधक व अभ्यासकांनी उदंड प्रतिसाद देत आपापल्या विषयांवर लिहिलेले एकूण 238 शोधनिबंध यांचे चार खंडाचे प्रकाशन करण्यात आले.
यांची विचार मंचावर उपस्थिती
परीषदेच्या अध्यक्षस्थानी ताप्ती एज्युकेशन सोसाटीचे अध्यक्ष डॉ.मोहन फालक होते. ते म्हणाले की, गांधी विचारांची खरी गरज भारतातील आजच्या परीस्थितीला आहे. भारतातील सर्व घटकांना गांधी विचार प्रेरणादायी व मार्गदर्शन करणारे आहेत. व्यासपीठावर संस्थेचे चेअरमन महेश फालक, कोषाध्यक्ष संजयकुमार नाहाटा, प्राचार्य डॉ.मीनाक्षी वायकोळे, उपप्राचार्यडॉ.एस.व्ही.पाटील, उपप्राचार्य डॉ.बी.एच.बर्हाटे, उपप्राचार्य डॉ.एन.इ.भंगाळे, परीषदेचे समन्वयक उपप्राचार्य डॉ.ए.डी.गोस्वामी, सी.डी.सी.चे सदस्य डॉ.जे.एफ.पाटील, उप समन्वयक डॉ.आर.एस.नाडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
150 प्राध्यापकांनी केले शोधनिबंध सादर
उद्घाटन कार्यक्रमानंतर दोन स्वतंत्र कक्षात दोन सत्रामध्ये शोधनिबंधाचे वाचन करण्यात आले. पहिल्या सत्रात सत्र अध्यक्ष म्हणून डॉ.मनोज गायकवाड होते तर दुसर्या कशात डॉ.सुरेश तायडे हे सत्र अध्यक्ष होते. दुपारच्या सत्रात डॉ.दिनेश महाजन व प्रा.दिनेश भोळे यांनी कामकाज सांभाळले. गांधी विचारांवर आधारीत जवळपास 150 प्राध्यापकांनी आपले शोध निबंध सादर केले. त्यात त्यांनी गांधीजींच्या आर्थिक, सामाजिक, राजकीय, ऐतीहासीक भाषा विषयक विचारांवर आधारीरत कथन केले.
नवीन शैक्षणिक चळवळ सुरू होणार
समारोपप्रसंगी प्राचार्य डॉ.मीनाक्षी वायकोळे म्हणाल्या की, गांधी विचाराने शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडून आली असून या परीषदेच्या माध्यमातून गांधी विचारांचा प्रचार व प्रसार होऊन नवीन शैक्षणिक चळवळ सुरू होईल. प्रसंगी प्रमुख पाहुणे सिनेट सदस्य प्रा.इ.जी.नेहेते उपस्थित होते. उद्घाटनप्रसंगी प्रास्ताविक परीषद समन्वयक उपप्राचार्य डॉ.ए.डी.गोस्वामी यांनी केले. सूत्रसंचालन डॉ.रेखा गाजरे, डॉ.रुपाली चौधरी यांनी केले.
यांचे यशस्वीतेसाठी परीश्रम
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ.एस.पी.झनके, डॉ.के.के.अहिरे, डॉ.रेखा गाजरे, डॉ.पी.ए.अहिरे, डॉ.किरण वारके, डॉ.डी.एम.टेकाडे, डॉ.स्मिता चौधरी, प्रा.व्ही.ए.सोळुंके, प्रा.डी.एन.पाटील, प्रा.एस.के.राठोड, डॉ.सचिन राजपूत, डॉ.प्रफुल्ल इंगोले, प्रा.एस.टी.धूम, डॉ.रुपाली चौधरी, प्रा.पुरुषोत्तम महाजन, प्रा.निनू झोपे, प्रा.जितू अडोकार, प्रा.दीपक शिरसाट, प्रा.दिनानाथ पाठक, डॉ.सुषमा तायडे, डॉ.स्वाती महाजन, प्रा.भारती सोनवणे, प्रा.भूषण धनगर, प्रा.निखील तायडे, प्रा.शिबा खान यांनी परीश्रम घेतले. दरम्यान, या परीषदेला भारतातील वेगवेगळ्या राज्यातून संशोधक प्राध्यापक उपस्थित होते.