सुरक्षा रक्षकांची मोठी कामगिरी ; पाच दहशतवाद्यांचा केला खात्मा !

0

कुलगाम-जम्मू-काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात आज रविवारी पहाटेपासून सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. येथे सुरक्षा दलाने काही दहशतवाद्यांना घेरले आहे. लष्कराच्या जवानांनी परिसराला चारही बाजुनी वेढले आहे. दरम्यान, या चकमकीत ५ दहशतवादी ठार झाले आहे.

सुरक्षा दलाला केलम परिसरात काही दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार लष्कराच्या९ राष्ट्रीय रायफल्स, जम्मू-काश्मीर पोलिस आणि केंद्रीय रिझर्व्ह पोलिस दलाच्या जवानांनी केलम गावाला चारही बाजुनी वेढले. त्यानंतर परिसरात शोधमोहिम हाती घेण्यात आली. त्याचवेळी दोन घरांमध्ये लपलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार केला. दहशतवाद्यांच्या गोळीबाराला भारताच्या जवानांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले असून दोन दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान याठिकाणी दोन्ही बाजुनी गोळीबार अद्यापही सुरूच आहे.