चाळीसगाव । सीमेवर रात्रंदिवस पाहरा करून जिवाची बाजी लावुन देशाचे रक्षण करणार्या भारतीय सैन्य दलातील सेवानिवृत्त जवानांना स्थानिक पातळीवर घरपट्टी व नळपट्टी माफ करण्यात यावी अशी मागणी रयत सेनेच्या वतीने बुधवारी चाळीसगाव नगरपरीषदेचे मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. भारतीय सैन्यदलाचे जवान सीमेवर रात्रंदिवस पाहरा करून जिवाची बाजी लावुन देशाचे रक्षण करतात, अशा भारतीय सैन्य दलातील सेवानिवृत्त जवानांना स्थानिक पातळीवर घरपट्टी व नळपट्टी माफ असते तसा कायदा देखील आहे. मात्र चाळीसगाव शहरात तशी सवलत जवानांना मिळत नाही. नगरपरीषदेत नगराध्यक्षा तथा नगरसेवक यांनी सेवानिवृत्त जवानांना घरपट्टी व नळपट्टी माफ करण्याचा ठराव केल्यास त्याचा फायदा त्यांना होवु शकतो.
पाचोरा शहरात झाली माफ
शेजारीच असलेल्या पाचोरा नगरपरीषदेच्या वतीने सेवानिवृत्त जवानांना घरपट्टी व नळपट्टी माफ करण्यात आली आहे. तेथे कोणत्याही जवानांना घरपट्टीव नळपट्टी भरावी लागत नाही, म्हणून पाचोरा नगरपरीषदेच्या धर्तीवर चाळीसगाव शहरातील भारतीय सैन्यदलातील सेवानिवृत्त जवानांना घरपट्टीव नळपट्टी माफ करण्यात यावी. आपण आपल्या स्तरावर पाठपुरावा व सुचना करून भारतीय सैन्यदलातील सेवानिवृत्त जवानांना घरपट्टी व नळपट्टी माफ करावी, अशी मागणी केली आहे.
अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा
मागणी मान्य झाल्यास रयत सेना येत्या 15 दिवसात नगर परीषद आवारात धरणे आंदोलन करेल कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास नगर परीषद, शासन व प्रशासन जबाबदार राहणार असल्याचा ईशारा देण्यात आला आहे. तालुक्यातील अनेक गावातील ग्रामीण भागतील काही जवान भारतीय सैन्यदलातुन सेवानिवृत्त झाले आहेत, त्यांची घरपट्टी व नळपट्टी संबंधीत ग्रामपंचायतीने माफ करावी, अशी मागणी देखील गणेश पवार यांनी केली आहे.
निवेदनार यांच्या आहेत स्वाक्षर्या
निवेदनावर रयत सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश पवार, माजी सैनिक संभाजी पाटील, योगेश पाटील, देवीदास राऊत, रयत शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष दिपक राजपुत, जिल्हाध्यक्ष संजय कापसे, विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष पंकज पाटील, शहराध्यक्ष भाऊसाहेब सोमवंशी, तालुका कार्याध्यक्ष दत्तु पवार, शिक्षक सेनेचे शहराध्यक्ष सचिन नागमोती, तालुका उपाध्यक्ष मुकुंद पवार, अनिल पाटील, विलास मराठे, समाधान मांडोळे, विनायक मांडोळे, निंबा जगताप, सुनिल निबाळकर, जयदीप पवार, सप्निल पाटील, अमोल पवार, निखिल देशमुख, कैलास सोनवणे, तुषार देशमुख, किरण देशमुख, अनिल पाटील, धनंजय पवार, हरीश पाटील, किशोर चव्हाण, मोहन पालवे, शुभम निकुंभ, संदीप पाटील, जगदीश पाटील, ऋषिकेश चौधरी, ऋषिकेश मोरे, तुषार पाटील आदींच्या स्वाक्षर्या आहेत.