सोमवती यात्रेला भाविकांची गर्दी

0

तीन लाख भाविकांनी हजेरी, भविकांच्या उपस्थितीत पालखी

जेजुरी – महाराष्ट्राचे श्रध्दास्थान व अठरा पगड जातीचे कुलदैवत म्हणून प्रसिध्द असलेल्या जेजुरीच्या खंडोबा देवाच्या सोमवती अमावस्या यात्रेसाठी सुमारे तीन लाख भाविकांनी हजेरी लावली. दुपारी एक वाजता सनई-चौघड्यांच्या निनादात ‘येळकोट येळकोट जय मल्हार’, असा जयघोष करत श्री खंडोबाची पालखी कर्हा स्नानासाठी निघाली. सायंकाळी पाच वाजता हजारो भाविकांच्या उपस्थितीत कर्हा नदीवर पालखीतील खंडोबा म्हाळसादेवींच्या मूर्तींना विधीयुक्त स्नान घालण्यात आले. श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी ही भर सोमवती अमावस्या असल्याने भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. सोमवारी खंडोबा गडामध्ये दुपारी 1 वाजता हजारो भाविकांच्या उपस्थितीत पालखी
सोहळ्यास सुरुवात झाली.

पावसाचा यात्रेवर झाला परिणाम
मुख्य पेशवे इनामदार यांनी सुचना करताच मानकरी, खांदेकर्यांनी पालखी उचलून खांद्यावर घेतली, पालखीत खंडोबा-म्हाळसादेवींच्या मुर्ती ठेऊन पालखी कर्हा स्नानासाठी निघाली. यावेळी भाविकांनी पिवळ्याधमक भंडार्याची मुक्त उधळण केली, भाविकांचा उत्साह मोठा होता. जेजुरीमध्ये आरोग्यास अपायकारक असणार्या भेसळयुक्त भंडार्याची मोठ्या प्रमाणात विक्री होत होती. या भंडार्‍याच्या विक्रीवर बंदी घालण्यासाठी भाजप आक्रमक आहे. राज्याच्या काही भागात असलेला बैल पोळा, सोमवारचे उपास, दोन दिवस पडत असलेला पाऊस याचा यात्रेवर काही प्रमाणात परिणाम जाणवला.