स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून सेनेचे अंबादास दानवे विजयी !

0

औरंगाबाद: विधान परिषदेच्या औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात झालेल्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार अंबादास दानवे विजयी झाले. काँग्रेसचे बाबुराव कुलकर्णी यांचा ४१८ मतांनी पराभव झाला. बादास दानवे यांना ५२४ तर आघाडीचे उमेदवार बाबुराव कुलकर्णी यांना १०६ मते मिळाली. काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या अब्दुल सत्तार यांनीही दानवे यांना पाठिंबा दिला होता. त्यामुळे युतीच्या विजयाची घोषणाच शिल्लक राहिली होती.

औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात निवडणुकीसाठी युतीकडून शिवसेनेचे अंबादास दानवे, तर आघाडीकडून बाबुराव कुलकर्णी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. या निवडणुकीसाठी १९ ऑगस्ट रोजी मतदान पार पडले होत. ६५७ मतदारांपैकी ५४७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. होता. १० मतदार गैरहजर राहिले होते. या निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीचे ३३० आणि महाआघाडीकडे २५०, तर एमआयएम आणि अपक्ष यांची ७७ मते होती.