कोथळीत स्वच्छता अभियान ; जि.प.शाळेतील विद्यार्थ्यांशी हितगुज
मुक्ताईनगर- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महात्मा गांधी यांच्या जयंतीपर्यंत चालणार्या ‘स्वच्छता ही सेवा’ या अभियानाची सुरुवात केली आहे. स्वच्छ भारत हे महात्मा गांधी यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी देशवासीयांना या अभियानात सहभागी होण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले आहे. आपण सगळे आपले घर स्वच्छ ठेवतो. पण आपला परिीसर स्वच्छ ठेवत नाही. अस्वच्छतेमुळे होणार्या ाजारांमुळे आपले आरोग्य धोक्यात आले असून पैसा, आपला वेळ वाया जात आहे. आपल्या नद्या या सांडपाणी वाहून नेणारी गटारे बनल्या आहेत. आपल्यातील किती जण आपल्या घराबरोबर, आपला परिसर स्वच्छ ठेवायचा प्रयत्न करतात? स्वच्छतेचे महत्व सांगतात आणि त्याचे अनुकरण करायला सांगतात? आणि स्वतः अनुकरण करतात? असा प्रश्न उपस्थित करीत स्वच्छता केवळ सफाई कर्मचार्यांचे नव्हे तर आपलेही कर्तव्यही असल्याचे प्रतिपादन खासदार रक्षा खडसे यांनी व्यक्त केले. श्री क्षेत्र कोथळी येथील जि.प.शाळेतील विद्यार्थ्यांशी त्यांनी बुधवारी हितगुज केली. प्रसंगी विद्यार्थ्यांनी स्वच्छतेचे महत्व पटवून देण्यासाठी त्यांनी शाळा आवारात स्वच्छताही केल्याने विद्यार्थीही भारावले.
आपल्यापासून करा बदलाची सुरुवात
खासदार खडसे म्हणाल्या की, आज सार्वजनिक ठिकाणी, बसमध्ये, ट्रेन मध्ये, कार्यालयामध्ये, रस्त्यावर सगळीकडे आपल्याला अस्वच्छता दिसते. सिगारेटची थोटके, खाद्य पदार्थांची वेष्टने, कागदाचे तुकडे, तंबाकू गुटख्याच्या पिचकार्यांनी रंगवलेल्या भिंती दिसतात. एकीकडे आपला देश महासत्तेच्या दिशेने वाटचाल करत आहे. मंगळावर आपले यान पोहोचले आहे मात्र आपली शहरे, आपले गाव आपण अस्वच्छ करत आहोत. यात बदल केला पाहिजे, याची सुरुवात आपण आपल्यापासून केली पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. आपण आपले घर जसे स्वच्छ ठेवतो तसेच सार्वजनिक ठिकाणी, शाळेमध्ये, एस.टी.मध्ये, उद्यानांमध्ये, इमारतींच्या आवारात स्वच्छता ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तसेच आपल्या मित्रांना, ऑफिसमधील सहकार्यांना, सर्वांना स्वच्छतेचे महत्व सांगितले पाहिजे. साफसफाई करणे हे फक्त सफाई कर्मचार्यांचे काम नसून, आपले पण कर्तव्य असल्याचे खासदार खडसे म्हणाल्या.