जळगाव: तालुक्यातील रीधुर येथील शेतकरी भिमराव सखाराम कोळी(वय-३४) यांनी स्वतःच्या शेतातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सेामवार संध्याकाळी उघडकीस आली. भिमराव कोळी यांनी दिवसभर शेतात काम केल्यानंतर संध्याकाळी शेताच्या बांधावरील लिंबाच्या झाडाला ठिबक नळीने गळफास घेत जिवन यांत्रा संपवली. पोलिस पाटील प्रमोद निंबा पाटील यांनी खबर दिल्यावरुन तालूका पेालिसांत या प्रकरणी अकस्मीक मृत्युची नोंद करण्यात आली आहे. तालूका पेालिस गुन्ह्याचा तपास करीत आहे.