पोलिसांचा लाठीमार, शहाद्यात आंदोलन
नंदूरबार : आधारभूत किमतीपेक्षा कमी किमतीत व्यापार्यांनी धान्य खरेदी करून शेतकर्यांची लूट केल्याच्या निषेधार्थ शहाद्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने बंद पुकारला होता. या बंदला हिंसक वळण लागले. भाजी मंडईत भाजी विक्रेत्यांच्या गाड्या उलटवल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर पोलिसांनी लाठीमार केला.
तहसील कार्यालयासमोर उपोषण
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष घनश्याम पाटील यांच्या नेतृत्वाखाली शहादा बंद आंदोलन करण्यात आले. बंद काळात राडा करणार्या युवकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले. आधारभूत किमतीपेक्षा कमी किमतीत हरभरा घेतलेल्या व्यापार्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने करण्यात आली. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनील पाटील म्हणाले, बाजार समिती प्रशासनाला कायद्याच्या चौकटीत राहून कार्य करावे लागते. बंदमुळे हमाल मापाड्यांचा रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. हरभर्याला इतर बाजारपेठेच्या तुलनेत अधिक भाव दिला आहे. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकर्यांची लूट करीत असल्याचा आरोप निराधार आहे.