स्वाभिमान डिवचल्यानेच सर्जिकल स्ट्राईक

0

पणजी : गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात भारताने पाकिस्तानमध्ये घुसून पाकिस्तानमध्ये घुसून करण्यात आलेला सर्जिकल स्ट्राईक कारवाईचे देशवासीयांनी जोरदार स्वागत करताना केंद्र सरकार व संरक्षण खात्यावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात केला. तथापी या कारवाईपूर्वीची पार्श्‍वभूमी माजी केंद्रीय संरक्षणमंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी कथित केली असून त्यातून एक नवे सत्यही उघड झाले आहे. एका न्यूज चॅनेलच्या अँकरने विचारलेल्या अपमानजक प्रश्नाला दिलेले ते उत्तर होते, असा खुलासा त्यांनी व्यवसायिकांशी संवाद साधताना केला आहे.

जेव्हा मला मणिपूरमध्ये 6 डोग्रा रेजिमेंटवर हल्ला झाल्याची आणि त्यात 18 जवान शहीद झाल्याची माहिती मिळाली तेव्हा ते मला खूप अपमानजक वाटलं. माझ्यासाठी तो वैयक्तिक अपमान होता, नॅशनल सोशलिस्ट काऊन्सिल ऑफ नागालँडसारख्या छोट्या दहशतवादी संघटनेकडून इतक्या भारतीय जवानांचा मृत्यू होणं हा माझ्यासाठी अपमानच होताफ, असं पर्रीकर यांनी सांगितलं. यानंतर 8 जून रोजी भारतीय लष्कराने थेट म्यानमारमध्ये घुसून आपल्या जवानांच्या हत्येचा बदला घेत अतिरेक्यांचा खात्मा केला होता.

वेळ आल्यावरच उत्तर दिले
भारतीय लष्कराने थेट म्यानमारमध्ये घुसून केलेल्या कारवाईनंतर एका टीव्ही अँकरने केंद्रीय मंत्री राज्यवर्धन सिंह राठोड एका कार्यक्रमात कशाप्रकारे सर्जिकल स्ट्राईक करण्यात येतो याची माहिती सांगत होते. यावेळी न्यूज अ‍ॅकरने त्यांनी तुम्ही हिच हिंमत वेस्टर्न फ्रंटवर दाखवणार का? असा सवाल विचारला. एक यशस्वी सर्जिंकल स्ट्राईक केल्यानंतर हा माझ्यासाठी अजून एक अपमान होता. मात्र मी ते शांतपणे ऐकून घेतले व वेळ आल्यावर याचं उत्तर द्यायचे ठरवले, अशी माहिती पर्रीकर यांनी दिली.

पाकिस्तानमध्ये घुसून करण्यात आलेल्या सर्जिंकल स्ट्राईकसाठी 15 महिन्यांपासून तयारी सुरु होती. 29 सप्टेंबर 2016 रोजी करण्यात आलेल्या सर्जिंकल स्ट्राईकसाठी 9 जून (2014)पासून म्हणजे 15 महिने आधीच तयारी सुरु झाली होती.
– मनोहर पर्रीकर,
गोव्याचे मुख्यमंत्री तथा माजी संरक्षणमंत्री