जम्मू : १५ ऑगस्टच्या निमित्ताने पाकिस्तानातून सीमेपलीकडून कार्यरत दहशतवादी संघटना मोठ्या हल्ल्याची योजना आखत आहेत. दहशतवादी ड्रोन हल्ले करू शकतात. याबाबत सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर आहेत. दहशतवादी सिमेवरील भारताच्या सुरक्षा चौक्यांवर हल्ला करु शकतात, यासाठी ते योजना आखत आहेत. यासाठी ते देशात दारुगोळा, शस्त्र पाठवत आहेत. सुरक्षा यंत्रणांना ही माहिती मिळाली आहे.
सुरक्षा यंत्रणांना मिळालेल्या माहितीनुसार, १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मदसह दहशतवादी संघटना मोठ्या दहशतवादी हल्ल्यांची योजना आखत आहेत. काश्मीरपासून दिल्लीपर्यंतच्या सुरक्षा यंत्रणांना दहशतवाद्यांच्या धोक्यामुळे गेल्या आठवड्यांत हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे. गुप्तचरांच्या माहितीनुसार, शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा भरलेल्या दहशतवाद्यांना भारतीय हद्दीत पाठवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. पंजाब आणि जम्मू -काश्मीरमधील सुरक्षा दलांनी गेल्या महिन्यात अनेक ड्रोन अडवले जेव्हा ते शस्त्र पुरवण्याचा प्रयत्न करत होते.
प्रमुख आस्थापने, सुरक्षा प्रतिष्ठाने, फॉरवर्ड पोस्ट आणि संरक्षण दल लक्ष्यवर आहेत, असे सूत्रांनी सांगितले आहे की हल्ल्यांसाठी अत्याधुनिक आयईडीचा वापर केला जाऊ शकतो.
कमांडर मोहम्मद सादिक यांच्या नेतृत्वाखाली सहा लष्कर कमांडर सध्या पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मधील कोटीलमध्ये आहेत आणि ते १५ ऑगस्टच्या आसपास देशात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करू शकतात आणि सुरक्षा चौक्यांना लक्ष्य करू शकतात, अशी माहिती देखील इंटेल इंटेलिजन्सने दिली आहे.