२ ऑक्टोबरपासून अण्णा हजारेंचा आंदोलनाचा इशारा

0

अहमदनगर : लोकपाल, कृषी समस्यासाठी २ ऑक्टोबरपासून आंदोलन करण्याचा इशारा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिला आहे. दरम्यान अण्णा हजारे याचं मन वळवण्यात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना अपयश आलं आहे. सरकारकडून लेखी आश्वासन जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आंदोलन करण्याबाबत आपण ठाम असल्याचा निर्धार अण्णा हजारेंनी व्यक्त केलाय.

अण्णांनी उपोषण करू नये यासाठी राज्य सरकारनं त्यांच्यासोबत चर्चा सुरू केलीय. यासाठी अण्णा हजारे यांच्यासोबत प्राथमिक चर्चेची जबाबदारी सरकारनं गिरीश महाजन यांच्यावर सोपवली आहे. त्याचाच भाग म्हणून गिरीश महाजन यांनी राळेगणसिद्धीत अण्णा हजारेंची भेट घेऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. अण्णांनी आंदोलन करू नये, अशी विनंती महाजनांनी यावेळी केली. मात्र आंदोलनाच्या भूमिकेवर अण्णा हजारे ठाम आहेत.