शिंदखेडा (अजय बोरदे)। देशपातळीवरील नीट आणि जेईई या प्रवेश परीक्षांना सामोरे जाताना विद्यार्थ्यांना येणार्या अडचणींचा विचार करून राज्य शिक्षण मंडळाने इयत्ता अकरावी व बारावीच्या विज्ञान विषयांच्या प्रश्नपत्रिकांच्या आराखड्यात बदल केला आहे. त्यानुसार आता पाठ्यपुस्तकातील प्रत्येक घटकाला महत्व प्राप्त झाले आहे. प्रश्नांचे बहुपर्याय बंद करण्यात आले असून एका प्रश्नाला त्याच घटकातील प्रश्नाचा पर्याय राहणार आहे. त्यामुळे शिक्षकांना अभ्यासक्रमातील प्रत्येक घटक शिकवावा लागणार असून घोकंपट्टीलाही मर्यादा येणार आहे. राज्यातील विद्यार्थ्यांना नीट व जेईई या परीक्षांना सामोरे जाताना खुप अडचणी येत असल्याच्या तक्रारी विद्यार्थी व पालकांकडून सतत केल्या जात होत्या. मंडळाचा अभ्यासक्रम तसेच प्रश्नपत्रिकांचे स्वरूप योग्य नसल्याचे सांगितले जात होते. त्यानुसार मंडळाकडून अभ्यासक्रमात बदल करण्यापासून प्रश्नपत्रिकांचे स्वरूप बदलण्याबाबत सातत्याने चाचपणी करण्यात आली.
देशभर एकच आराखडा
कौन्सिल ऑफ बोर्ड्स ऑफ स्कुल एज्युकेशन इन इंडियाने (कॉब्से) देशातील इयत्ता अकरावी व बारावी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र व गणित आणि संख्याशास्त्र या चार विषयांच्या परीक्षांचे देशपातळीवर एकाच पध्दतीचे आराखडे तयार केले होते. राज्य मंडळाने नीट व जेईई परीक्षा तसेच विद्यार्थ्यांना येणार्या अडचणींचा विचार करून या चार विषयांच्या प्रश्नपत्रिकांचे नवीन आराखडे तयार केले आहेत. राज्य शासनाकडूनही या आराखड्यांना मान्यता मिळाली असून चालु शैक्षणिक वर्षापासून इयत्ता अकरावीसाठी त्याची अंमलबजावणी सुरू केली जाणार आहे. तर इयत्ता बारावीची फेब्रुवारी 2019 मधील परीक्षा सुधारीत आराखड्यानुसार असेल, असे मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. चारही विषयांच्या प्रश्नपत्रिकांचा आराखडा बदलताना प्रचलित अभ्यासक्रमात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र या विषयाच्या 100 गुणांपैकी लेखी परीक्षा 70, तर प्रात्यक्षिक परीक्षेसाठी 30 गुण असतील. गणित आणि संख्याशास्त्र विषयासाठी 80 गुणांची लेखी, तर 20 गुण प्रात्यक्षिक परीक्षेसाठी असतील.
नविन प्रश्नपत्रिका आराखडा
इ.11व इ.12 भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र या विषयांचा प्रश्नपत्रिकेचा नविन आराखडा सारखा आहे.यात एकूण चार विभाग करण्यात आले आहेत.पहिला विभाग (सेक्शन अ )हा आठ मार्कांचा असून एकूण आठ प्रश्न आहेत.त्या पहिले चार प्रश्न बहूपर्यायी तर नंतरचे चार एका वाक्यात उत्तरे द्या .या विभागाला एकूण आठ मार्कस् आहेत.(सेक्शन ब) हा एकूण 14 मार्कांचा असून त्यामध्ये 7 लघूत्तरी प्रश्न आहेत.प्रत्येक प्रश्नाला दोन मार्कस् आहेत. (सेक्शन क) हा एकूण 33 मार्कांचा असून त्यामध्ये 11 लघूत्तरी प्रश्न असून प्रत्येक प्रश्नाला तीन मार्कस आहेत.(सेक्शन ड) हा एकूण 15 मार्कांचा असून यामध्ये तीन दिर्घोतरी प्रश्न असून प्रत्येक प्रश्नाला पाच मार्कस् आहेत.चारही विभाग मिळून प्रश्नपत्रिकेत प्रश्नांची एकूण संख्या 1ते 29 अशी असेल.जिवशास्त्र विषयाच्या प्रश्नपत्रिकेत एकूण प्रश्नांची संख्या 30 आहे.यातही चार विभाग आहेत. (सेक्शन अ) हा 8मार्कांसाठी असून प्रत्येक प्रश्नाला एक मार्क आहे.यांत पहिले चार प्रश्न बहूपर्यायी तर नंतरचे चार प्रश्न एका वाक्यात उत्तरे द्या असा आहे.(सेक्शन ब ) हा 20 मार्कांसाठी असून प्रत्येक प्रश्नाला दोन मार्कस् आहेत.(सेक्शन क ) हा 27 मार्कांचा आहे.यामध्ये नऊ लघूत्तरी प्रश्न असून प्रत्येक प्रश्नाला तीन मार्कस् आहेत.(सेक्शन ड) हा 15 मार्कांसाठी आहे.यात तीन दिर्घोत्तरी प्रश्न असून प्रत्येक प्रश्नाला पाच मार्कस् आहेत.गणित व संख्याशास्र विषयाच्या प्रश्न पत्रिकेत एकूण तीस प्रश्न आहेत.यातही विभाग आहेत. (सेक्शन अ) हा सहा मार्कांसाठी असून प्रत्येक प्रश्नाला एक मार्कस् आहे.प्रश्न सहाच असावेत.(सेक्शन ब )हा 16 मार्कांचा असून यांत आठ लघुत्तरी प्रश्न आहेत.प्रत्येक प्रश्नाला दोन मार्कस् आहेत.(सेक्शन क) हा 18 मार्कांचा असून यात प्रत्येक प्रश्नाला तीन मार्कस् आहेत.यामध्ये प्रश्नांची संख्या सहा आहे.(सेक्शन ड) हा 40 मार्कांचा आहे.यांत दहा दिर्घोत्तरी प्रश्न असून प्रत्येक प्रश्नाला चार मार्कस् आहेत.प्रात्यक्षिक परीक्षा पूर्ववतच
लेखी परीक्षेसाठी प्रत्येकी एकच प्रश्नपत्रिका व एकच उत्तरपत्रिका राहील. या परीक्षा संपूर्ण अभ्यासक्रमावर राहतील. प्रात्यक्षिक परीक्षांच्या आराखड्यातही बदल करण्यात आलेला नाही, असे मंडळाने स्पष्ट केले आहे.प्रश्नपत्रिकांमध्ये बदल करताना प्रामुख्याने नीट, जेईई तसेच देशपातळीवरील इतरप्रवेश परीक्षांचा विचार करण्यात आला आहे.विद्यार्थ्यांना काही अडचणी येत होत्या. सुधारीत प्रश्नपत्रिकांच्या आराखड्यामुळे या परीक्षांना सामोरे जाताना अडचणी येणार नाहीत. पुर्वी प्रश्नपत्रिकांमध्ये चार-पाच प्रश्न देवून त्यातील दोन-तीन प्रश्न सोडविण्यास सांगितले जात होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना जास्त पर्याय मिळत होते. आता त्यात बदल करण्यात आला आहे. सुधारीत आराखड्या मध्ये एका प्रश्नाला एकच पर्यायी प्रश्न असेल. हे प्रश्नही पाठ्यपुस्तकातील एकाच घटकाशी संबंधित असणार आहे. तसेच काठिण्यपातळीही नीट व जेईई प्रमाणे ठरविण्यात आली आहे. यामुळे शिक्षकांना आता अभ्यासक्रमातील कोणताही घटक बाजुला ठेवता येणार नाही. प्रत्येक घटक शिकवावाच लागणार आहे.तसेच विद्यार्थ्यांनाही केवळ पाठांतर करून भागणार नाही, संबंधित विषयाच्या सखोल अभ्यास करावा लागणार आहे.