राज्यात बारावीत 85.88 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण; मुलीच ठरल्या टॉपर

0

पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनी निकालात बाजी मारली. यंदा राज्याचा निकाल 85.88 टक्के लागला असून तो मागील वर्षापेक्षा 2.53 टक्क्यांनी घसरला आहे. याबाबत बोर्डाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी माहिती दिली. हा निकाल दुपारी 1 वाजता बोर्डाच्या वेबसाईटवर जाहीर होणार आहे. बारावीच्या लेखी परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०१९ मध्ये पार पडली होती. सर्वाधिक निकाल कोकण विभागात तर नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे.

यंदा राज्यभरातून एकूण १४ लाख ९१ हजार ३०६ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली. त्यापैकी ८ लाख ४२ हजार ९१९ विद्यार्थी व ६ लाख ४८ हजार १५१ विद्यार्थीनी आहेत. राज्यातील ९ हजार ७७१ कनिष्ठ महाविद्यालयांमधून या विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती. यंदा विज्ञान शाखेतून सर्वाधिक ५ लाख ६९ हजार ४४६ विद्यार्थ्यांनी त्यापाठोपाठ कला शाखेतून ४ लाख ८२ हजार ३७२ तर वाणिज्य शाखेतील ३ लाख ८१ हजार ४४६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या ५८ हजार १२ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ठ झाले. राज्य मंडळाच्या मुंबई विभागातून सर्वाधिक ३ लाख ३५ हजार विद्यार्थी परीक्षा देत आहेत तर सर्वात कमी ३२ हजार ३६२ विद्यार्थी कोकण विभागातून परीक्षेला प्रविष्ठ झाले आहेत.

शाखेनिहाय निकाल

विज्ञान शाखा निकाल :92.60टक्के

कला शाखा निकाल :76.45 टक्के

वाणिज्य शाखा निकाल :88.28टक्के

उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम :78.93 टक्के