बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीवर भारताचा कब्जा

0

धर्मशाळा । हिमाचल प्रदेशातील धर्मशाळा येथे सुरू असलेल्या बार्डर-गावस्कर ट्राफीवर भारताने विजयाचा झेंडा रोवला आहे. हा विजयाचा झेंडा भारताने 4 वर्षानंतर रोवण्यात यश आहे.त्यात विशेष म्हणजे अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात पहिली कसोटी भारतीय संघ खेळत होता.कांगारूने दिलेल्या 106 धावांचे आव्हान भारताने 2 गडी गमवून कांगारूचा धुव्वा उडवित मालिकेवर कब्जा केला.या मालिकेत रविद्र जडेजा याने कांगारूच्या गोलंदाज व फलंदाजाचा चांगला समाचार घेतला.त्यामुळे त्याला सामनाविर व मालिकावीर या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.कसोटी खेळणार्‍या सर्व नऊही देशांविरोधात कसोटी मालिका जिंकण्यार्‍या देशांच्या यादीत भारताचा नंबरविराट कोहलीच्या नेतृत्त्वात सलग 7 कसोटी मालिका विजय कर्णधारपदी विराजमान झाल्यानंतर पहिल्याच कसोटीत विजय मिळवण्याची कामगिरी करणार अजिंक्य रहाणे नववा कर्णधार, तर पाचवा मुंबईकर. यापूर्वी उम्रीगर, सुनील गावसकर, रवी शास्त्री आणि सचिन तेंडुलकर यांनी अशी कामगिरी केली होती.

विजय गोलंदाजीच्या जोरावर
चौथ्या कसोटी कांगारूने प्रथम फलंदाजी करित 300 धावा केल्या या प्रतित्तर देत 332 धावा पहिल्या डावात केल्या.32 धावांची आघाडी घेतली होती.आघाडी जास्त नसल्याने भारतीय गोलंदाजानी त्याच्या फिरकीच्या व तेज गोलंदाजीच्या जोरावर कांगारूंचा दुसरा 137 धावांवर संपुष्टात आणला.त्यामुळे भारताला विजयासाठी 106 धावांची गरज होती. रहाणेच्या वेगावन फलंदाजीसमोर ऑस्ट्रेलियाचे 106 धावांचे आव्हान तुटपुंज ठरले. रहाणेने 27 चेंडूत झटपट नाबाद 38 धावा केल्या. या खेळीत त्याने चार चौकार आणि 2 खणखणीत षटकार ठोकले. पॅट कमिन्सला सलग दोन षटकार ठोकून, रहाणेने ऑस्ट्रेलियाची हवा काढली.दुसरीकडे या कसोटी मालिकेत तुफान फॉर्ममध्ये असलेला सलामीवीर के एल राहुलने आणखी एक नाबाद अर्धशतक झळकावले. राहुलने 76 चेंडूत नाबाद 51 धावा केल्या.या कसोटी सामन्यात आणि मालिकेत अष्टपैलू कामगिरी करणारा रवींद्र जाडेजाला सामनावीर आणि मालिकावीराच्या पुरस्काराने गौरवण्यात आले.

ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सला सलग दोन सिक्सर ठोकत, अजिंक्य रहाणेने विजयाच्या दिशेने वेगाने आगेकूच केली.ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या धर्मशाला कसोटीत भारताचे दोन फलंदाज तंबूत परतले आहेत. सलामीवीर के एल राहुल टिच्चून फलंदाजी करत असून, त्याच्या जोडीला कर्णधार अजिंक्य रहाणे आला आहे.एक चोरटी धाव घेण्याच्या नादात चेतेश्वर पुजारा शून्यावर धावबाद झाला. ग्लेन मॅक्स्वेलने अप्रतिम फिल्डिंग करत, त्याला धावबाद केले .त्याआधी सलामीवीर मुरली विजयला पॅट कमिन्सने विकेटकिपर मॅथ्यू वेडकरवी झेलबाद केले. विजयने 8 धावा केल्या.भारताने आज बिनबाद 19 धावांवरुन चौथ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात केली. मात्र संघाची धावसंख्या 46 झाली असताना आधी विजय मग पुजारा दोघेही माघारी परतले.

राहणेच्या नेतृत्वात विजय
अजिंक्य रहाणेच्या नेतृत्त्वाखाली पहिल्या कसोटी सामन्यातच भारताने विजय साजरा केला. बोर्डर-गावस्कर ट्रॉफी भारताने 2-1 ने जिंकली. या कसोटीच्या चौथ्या दिवशी भारताला विजयासाठी 87 धावांचे माफक लक्ष्य होते. त्याचा पाठलाग करताना मुरली विजय आठ धावांवर आणि चेतेश्वर पुजारा शून्यावर बाद झाला. पण लोकेश राहुल आणि अजिंक्य रहाणेने अभेद्य अर्धशतकी भागीदारी रचून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. राहुलनं 76 चेंडूंत 9 चौकारांसह नाबाद 51 धावांची खेळी रचली. तर रहाणेनं 27 चेंडूंत 4 चौकार आणि दोन षटकारांसह नाबाद 38 धावा फटकावल्या.

उमेश यादव, रवीचंद्रन अश्विन आणि रवींद्र जाडेजानं ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव अवघ्या 137 धावांत गुंडाळून टीम इंडियाला धर्मशाला कसोटीसह चार कसोटी सामन्यांची मालिकाही जिंकण्याची संधी मिळवून दिली.या कसोटीत टीम इंडियानं पहिल्या डावात 32 धावांची आघाडी घेतली होती. त्यामुळं अजिंक्य रहाणे आणि त्याच्या शिलेदारांसमोर ही कसोटी आणि मालिका जिंकण्यासाठी अवघ्या 106 धावांचं आव्हान आहे.

अशा होत्या चौथ्या सामन्याच्या इनिंग…
ऑस्ट्रेलिया पहिली इनिंग – 300 रन
भारत पहिली इनिंग – 332 रन (32 रनची आघाडी)
ऑस्ट्रेलिया दूसरी इनिंग – 137 रन ( 106 रनची आघाडी)
भारत दूसरी इनिंग 106/2 रन (8 विकेटने सामना जिंकला)

4 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियासोबत जिंकली मालिका…
या सामन्याच्या विजयाची गुढी उभारतांनाच टीम इंडियाने चार वर्षानंतर बॉर्डर-गावस्कर चषकावर पुन्हा कब्जा मिळवाला. भारताने शेवटी 2012-13 मध्ये 4-0 ने विजय मिळवत बॉर्डर-गावसकर चषक जिंकला होता. 1996-97 मध्ये बॉर्डर-गावसकर चषकाची सुरूवात झाली. तेव्हापासून 13 वेळा भारत-ऑस्ट्रेलिया दरम्यान ही कसोटी मालिका होत आहे. यातील 6 मालिका टिम इंडियाने आणि 5 ऑस्ट्रेलियाने जिंकल्या आहेत. 2003-04 मध्ये खेळण्यात आलेली कसोटी मालिका ड्रॉ झाली होती. परंतु, त्याआधी (2000-01) च्या मालिका भारताने जिंकल्याने चषक टीम इंडियाला प्रदान करण्यात आला होता.

निकाल मालिकेतील सामन्याचे
पहिला सामाना- पुणे, ऑस्ट्रेलियाचा 333 रन विजय
दुसरा सामना- बंगलुरु, भारताने 75 रनने सामना जिंकला
तिसरा सामना- रांची, समाना ड्रॉ झाला
चौथा सामना- धर्मशाला, भारताने 8 विकेट ने जिंकून विजयाची गुढी उभारली

संपूर्ण कसोटी मालिकेतील विक्रम
सर्वाधिक विकेट – रवींद्र जाडेजा – 25 आर अश्विन – 21 ओकिफ – 19 लायन – 19 सर्वाधिक धावा
स्टीव्ह स्मिथ – 499 चेतेश्वर पुजारा – 405 के एल राहुल – 393

भारतीय भूमीतील टीम इंडियाचे विजय
वि. न्यूझीलंड : 3-0वि. इंग्लंड : 4-0वि. बांगलादेश : 1-0ऑस्ट्रेलिया : 2-1