नवी दिल्ली: या सरकारने स्वच्छ भारत अभियान प्राधान्याने राबविले आहे. येत्या 2 ऑक्टोंबर पर्यंत देश हागणदारीमुक्त होईल असे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यावेळी सांगितले. स्वच्छ भारत योजनेमुळे 5.6 लाख गावं हागणदारीमुक्त झाले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. 2 ऑक्टोबर 2014 पासून 9.6 कोटी शौचालयांची निर्मिती झाल्याचे त्यांनी सांगतिले.
अर्थसंकल्पातील ठळक मुद्दे
*स्टार्ट अप इंडियासाठी टीव्ही चॅनल सुरू करणार असल्याचीही घोषणा निर्मला सीतारामन यांनी केली याद्वारे तरूणांना मार्गदर्शन दिले जाणार आहे.
*रोबो आणि विशेष मशिन्ससाठी बँका अर्थसहाय्य करणार
*सर्वांना स्वच्छ पाणी पुरवण्यासाठी जल शक्ती मंत्रालयाची स्थापना
*खेलो भारत योजनेचा विस्तार करणार; राष्ट्रीय क्रीडा शिक्षण बोर्डाची स्थापना करणार
*स्वच्छ भारत योजनेमुळे 5.6 लाख गावं हागणदारीमुक्त
*2 ऑक्टोबर 2019 पर्यंत देश हागणदारीमुक्त होणार
*स्टार्टअप उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी दूरदर्शनचं स्वतंत्र चॅनेल सुरू करणार
*2 ऑक्टोबर 2014 पासून 9.6 कोटी शौचालयांची निर्मिती