मुंबई: केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात मुंबईत किसान सभेने मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. लाखोंच्या संख्येने शेतकरी सहभागी होत आहे. याला राजकीय पक्षांनी देखील पाठींबा दिलेला आहे. राज्यातील २१ जिल्ह्यातील शेतकरी या मोर्च्यात सहभागी झाले आहे. महाविकास आघाडीतील पक्षाने या मोर्चाला पाठींबा देत सहभागी झाले आहे. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष मंत्री बाळासाहेब थोरात, शिवसेना नेते मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीतील अनेक नेते आझाद मैदानावर दाखल झाले असून मोर्चात सहभाग नोंदविला आहे. मोर्चा सध्या आझाद मैदानात असून थोड्याच वेळात तो राजभवनावर धडकणार आहे. कृषी कायदे रद्द करण्याची मागणी करणारे निवेदन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना देण्यात येणार आहे.
शेतकऱ्यांचा मोर्चा थोड्याच वेळात राजभवनावर धडकणार आहे. मात्र राज्यपाल भगतसिंह कोश्यारी सध्या राजभवनात नाहीत. ते गोव्यात आहेत. कोश्यारी यांच्याकडे गोव्याच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त पदभार आहे. त्यामुळे राज्यपालांकडून शेतकरी मोर्चाच्या शिष्टमंडळाला संध्याकाळी पाचची वेळ दिली असल्याचं समजतं. त्यामुळे राज्यभरातून मुंबईत आलेले शेतकरी आज मुक्काम करण्याची शक्यता आहे.