या वेळी संवादामध्ये बोलतांना सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता पृथ्वी चौहान म्हणाले की, सी.डी.एस्. बिपिन रावत हे ‘आत्मनिर्भर भारत’ योजनेअंतर्गत तिन्ही सैन्य दलाचे सक्षमीकरण करत होते. अडीच आघाड्यांवर म्हणजे एक मोर्चा पाकविरोधात, दुसरा मोर्चा चीनविरोधात आणि अर्धा मोर्चा देशद्रोह्यांच्या विरोधात ते लढत होते. जिहादी नेत्यांना घरात घुसून मारले जात होते. त्यामुळे रावत यांच्या निधनावर जिहादींना आनंद होत आहे; मात्र देशप्रेमींनी एकत्र येऊन त्यांना उत्तर द्यायला हवे.
‘भारत रक्षा मंच’चे राष्ट्रीय सचिव श्री. अनिल धीर म्हणाले की, सी.डी.एस्. बिपिन रावत यांच्या निधनावर आनंद व्यक्त करणारे जे जिहादी प्रवृत्तीचे लोक आहेत. ते पूर्वी सैन्यदलावर बलात्काराचे, काश्मीरमधील वाट चुकलेल्या तरुणांना ठार मारत असल्याचे आरोप करून त्यांचे खच्चीकरण करायचे. त्यांच्या जोडीला कम्युनिस्ट, चीनसमर्थक, आतंकवादी आणि फुटीरतावादी लोक विविध वृत्तवाहिन्यांवर चर्चा करून सैन्याचे मनोबल कमी करण्याचा प्रयत्न करत होते. जे सैन्य स्वत:चे जीवन धोक्यात घालून देशाचे रक्षण करत आहे, त्याविषयी अवमानकारक बोलणे चुकीचे आहे.
हिंदु जनजागृती समितीचे मध्य प्रदेश आणि राजस्थान समन्वयक श्री. आनंद जाखोटिया म्हणाले की, आता युद्धात बदल झाला आहे. त्यामुळे सीमेवरील शत्रूंसह अंतर्गत देशद्रोह्यांशी सैन्याला लढावे लागत आहे. त्रिपुरामध्ये झालेल्या घटनांवरून महाराष्ट्रात 6 ठिकाणी धर्मांधांनी दंगली केल्या. पुढे अशा घटना आणखीन वाढतील. या अराजकता वाद्यांबरोबर देशवासियांना मोठा संघर्ष करावा लागणार आहे. सैन्याचा अपमान आणि देशाच्या विरोधात लढणार्या अंतर्गत शत्रूंवर कठोर कारवाईसाठी केंद्रशासनाने नवीन कायदा केला पाहिजे. तसेच सर्व देशप्रेमींनी एकत्र येऊन या देशद्रोह्यांना सडेतोड उत्तर दिले पाहिजे, असेही श्री. जाखोटिया म्हणाले.