राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य शासनाने नवीन नियमावली जाहीर केली आहे त्यानुसार राज्यात 10 जानेवारीपासून रात्री संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
या गोष्टी राहणार बंद
मैदान, उद्यान, पर्यटन स्थळ, प्राणी संग्रहालय, संग्रहालय, गड किल्ले कॉलेज व शाळा
लग्नाचं शुभकार्य फक्त ५० लोकांच्या उपस्थितीमध्ये करण्याची परवानगी
अंत्यसंस्कारावेळी २० लोकांना उपस्थित राहण्यास मुभा
सामाजिक, धार्मिक, राजकीय कार्यक्रमांना ५० लोकांना उपस्थित राहण्यास परवानगी.
दिवसा ५ पेक्षा अधीक लोकांना एकत्र येता येणार नाही.
– रात्री फक्तं अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहे.
– ५० टक्के क्षमतेनं नाट्यगृह, सिनेमागृह सुरू राहणार
– राज्यातील हॉटेल आणि रेस्टाँरंट रात्री १० ते सकाळी ८ वाजेपर्यंत बंद, दिवसा ५० टक्के क्षमतेने सुरू रहणार.
– बाहेरील राज्यातून महाराष्ट्रात येणार्यांना ७२ तास आधीचा RTPCR चाचणी बंधणकारक
– हॉटेल, रेस्टॉरंट 50 टक्के क्षमतेने रात्री दहा वाजेपर्यंतच सुरू राहण्यास परवानगी देण्यात आली आहे.
– हेअर कटिंग सलून ५० टक्के क्षमतेनं सुरू राहणार
– विवाहाच्या बाबतीत, मग ते बंदिस्त जागेत असो किंवा मैदान असो, उपस्थितांची जास्तीत जास्त संख्या ५० व्यक्तींपुरती मर्यादित असेल.
– सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय किंवा धार्मिक असो, कोणत्याही मेळाव्याच्या किंवा कार्यक्रमाच्या बाबतीत. बंदिस्त जागेत असो किंवा खुले असो, उपस्थितांची जास्तीत जास्त संख्या ५० व्यक्तींपुरती मर्यादित असेल.
– अंत्यसंस्काराच्या बाबतीत, उपस्थितांची जास्तीत जास्त संख्या 20 व्यक्तींपुरती मर्यादित असेल