‘अ‍ॅमेझॉन’वर त्वरित कारवाई करा ! – सुराज्य अभियान

      भारताचा राष्ट्रध्वज आणि भारताचे मानचित्र अर्थात नकाशा हे कोट्यवधी भारतियांच्या राष्ट्रीय अस्मितेचा विषय आहेराष्ट्रध्वजाच्या वापराविषयी ‘ध्वजसंहिते’मध्ये नियम दिलेले आहेतत्याचे उल्लंघन करणे हा गुन्हा आहेतसेच भारताच्या नकाशाचे विकृतीकरण करणेहा देखील गुन्हा आहेअसे असतांना ‘अ‍ॅमेझॉन’ कंपनीने ध्वजसंहितेचे उल्लंघन करत भारताचा राष्ट्रध्वज छापलेले टीशर्टबूट आदी उत्पादनेतसेच विकृतीकरण केलेले भारताच्या नकाशाचे विनाईल स्टीकर्स यांची विक्री वेबसाइटद्वारे करत आहेयापूर्वी अनेकदा ‘अ‍ॅमेझॉन’ कंपनीला याविषयी कळवूनही कंपनीने काहीही पालट न करता ही विक्री चालूच ठेवली आहेभारतीय राष्ट्रीय प्रतिकांचा सातत्याने अवमान करणार्‍या ‘अ‍ॅमेझॉन’ कंपनीची ही मुजोरी आता थांबवायलाच हवीजोवर ‘अ‍ॅमेझॉन’ कंपनी भारत सरकार आणि भारतीय जनतेची जाहीर क्षमायाचना करत नाहीतोवर ‘अ‍ॅमेझॉन’ कंपनीवर बहिष्कार घालावाअसे आवाहन करत भारत सरकारने ‘अ‍ॅमेझॉन’वर त्वरित कायदेशीर कारवाई करावीअशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या ‘सुराज्य अभियाना’च्या वतीने केंद्रीय गृहमंत्री माश्रीअमित शहा यांच्याकडे करण्यात आलीया संदर्भात नुकतेच एक निवेदन मागृहमंत्र्यांना पाठवण्यात आले आहे.

     या निवेदनात म्हटले आहे कीभारताच्या नकाशातून पाकव्याप्त आणि चीनव्याप्त काश्मीरचा भूभाग वगळलेला भारताचा नकाशा असलेले विनाईल स्टीकर्सतसेच अशोकचक्रासह तिरंगा छापलेले टीशर्ट आणि बूट विकण्याची अ‍ॅमेझॉन ही पहिलीच वेळ नाहीयापूर्वीही अ‍ॅमेझॉनने राष्ट्रध्वजाप्रमाणे ‘तिरंगा मास्क’, ‘तिरंगा टोपी’ आदी उत्पादनांची विक्री करत राष्ट्रध्वजाची विटंबना केली आहेकाही दिवसांपूर्वी तर ‘अ‍ॅमेझॉन’वर गांजाची विक्री देखील झाल्याचे उघड झाले होतेयासंदर्भातही समितीने ‘सुराज्य अभियाना’च्या वतीने केंद्र सरकारकडे तक्रार केली होती.

       ‘राष्ट्रीय मानचिन्हांचा गैरवापर रोखणे कायदा 1950’च्या कलम आणि नुसार; ‘राष्ट्र प्रतिष्ठा अवमान प्रतिबंध अधिनियम 1971’च्या कलम नुसार आणि ‘बोधचिन्ह व नाव (अनुचित वापरास प्रतिबंधअधिनियम 1950’ या तिन्ही कायद्यांनुसार हे दंडनीय गुन्हे आहेतत्यामुळे सरकारने अ‍ॅमेझॉनवर कठोर कारवाई करावीअशी आमची मागणी आहेजर सरकारने यानुसार कारवाई केली नाहीतर ‘भारतीय कायदे निरुपयोगी आहेत’असे चित्र निर्माण होईल आणि राष्ट्रध्वज अन् मानचित्र यांचा कोणीही अवमान करू धजावेल हे टाळण्यासाठी भारत सरकारने या गंभीर विषयाची त्वरित दखल घ्यावीअसे आवाहन ‘सुराज्य अभियाना’च्या वतीने करण्यात आले आहे.