। History of shivaji maharaj in jalgaon district ।
जळगाव जिल्ह्यात शिवाजी महाराज आले होते, याचे पुरावे मिळतात ते आग्रा स्वारी वेळी. शिवाजी महाराज जेव्हा आगर्याला जात होते तेव्हा ते जामनेरहुन गेले होते, अशी नोंद इतिहासात असल्याची माहिती दादा नेवे यांनी दिली.
तत्कालीन मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले यांनी 1983 साली शिवाजी महाराजांच्या या अश्वारूढ पुतळ्याचे लोकार्पण केले होते. हा पुतळा तेव्हापासूनच अश्वारूढ असला तरी आजूबाजूला सुशोभिकरण झाले नव्हते. म्हणून ज्येष्ठ शिवसैनिक दादा (दुर्गादास) नेवे यांनी 2008 मध्ये महापालिएकेच्या महासभेत या पुतळ्याचे सुभोभिकरण करावे आणि जी.एस. ग्राउंडचे नामांतरण शिवतीर्थ मैदान म्हणून करावे असा ठराव पारित करून घेतला. लगेचच 1.5 लाख रुपये खर्चून याठिकाणी या पुतळ्याचे सुशोभीकरण काण्यात आले. खास पुण्याहून अतुल पानघंटी या
शिल्पकारांना बोलावून पुतळ्याच्या चौथर्यावर रेखीवकाम करण्यात
आले. ही जागा खर्या अर्थाने जिल्हा परिषदेकडे होती.
मात्र, माजी आ.सुरेशदादा जैन यांच्या पुढाकाराने ही जागा मनपाकडे हस्तांतरित केल्याची माहिती नेवे यांनी दिली. शिवजयंती उत्सवाचा इतिहास जळगाव जिल्ह्यातील तत्कालीन जिल्हाधिकारी प्रदीप यांनी पुढाकार घेत जळगाव जिल्ह्यात शिवजयंती उत्सव रुजविला. यावेळी नेवे यांनी सांगितले. त्यांनी सांगितले की, तत्कालीन जिल्हाधिकारी हे शिवजयंती उत्सवात स्वतः लेझीम खेळायचे. एका उघड्या कारमध्ये शिवाजी महाराजांची प्रतिमा ठेवण्यात येत असे. मिरवणूक काढण्यात येत असल्याची माहिती नेवे यांनी दिली.