3 वाजेपर्यंत आम्ही पराभव स्वीकारणार नाही: मनोज तिवारी

0

नवी दिल्ली: दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी ८ फेब्रुवारीला मतदान झाले आज मंगळवारी ११ रोजी मतमोजणी होत आहे. दिल्ली राजधानीच्या निवडणुकीत आम आदमी पार्टी आणि भाजपमध्ये मुख्य लढत पाहायला मिळाली. मतमोजणीत सुरुवातीपासून आम आदमी पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे. दरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष मुख्यमंत्री पदाचे प्रमुख दावेदार मनोज तिवारी यांनी ३ वाजेपर्यंत भाजप पराभव स्वीकारणार नाही. ३ वाजेनंतर जनतेने भाजपला भरभरून मतदान केले आहे असे मनोज तिवारी यांनी सांगितले. भाजपा पराभव झाल्यास पराभवाची जबाबदारी देखील माझीच आहे असेही तिवारी यांनी सांगितले.

केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने ७० पैकी ५० जागांवर आघाडी घेतली आहे. भाजपने मागील निवडणुकीपेक्षा अधिक जागांवर आघाडी मिळवली आहे. भाजप २० जागांवर आघाडी घेतली आहे. कॉंग्रेसला मात्र एकाही जागांवर आघाडी घेता आलेली नाही.

५१ टक्के दिल्लीकरांची ‘आप’ला पसंती
सकाळी १०.३० वाजेपर्यंत झालेल्या मतमोजणीची आकडेवारी दिल्ली निवडणूक आयोगाने जाहीर केली आहे. त्यानुसार आम आदमी पक्षाला ५१ टक्के तर भाजपला ४० टक्के मते मिळाली आहे. कॉंग्रेसला ५ टक्केही मत मिळताना दिसत नाही. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार आपने ५० जागांवर आघाडी मिळवली आहे तर भाजपने १८ जागांवर आघाडी घेतली आहे.