राज्यात दोन टप्प्यात ५० हजार शिक्षकांची भरती करणार

पहिल्या टप्प्यात ३० हजार शिक्षकांची भरती होणार : शिक्षण मंत्री केसरकर

मुंबई l

ज्यातील शाळांमध्ये रिक्त पदांनुसार राज्यातील पहिल्या टप्प्यात ३० हजार शिक्षकांची भरती करण्यात येणार आहे तर दुसऱ्या टप्यात जवळपास २० हजार शिक्षकांची भरती केली जाईल, अशी माहिती राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली. विद्याथ्यांचे आधार वेरिफिकेशन पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरती संदर्भात आकडा कळेल, असेही त्यांनी त्यांनी म्हटले आहे. शिक्षक भरती संदर्भात दीपक केसरकर म्हणाले की, नवीन शैक्षणिक वर्ष सुरु होण्यापूर्वीच ही शिक्षक भरती करण्याचा आमचा विचार आहे. पहिल्या टप्यात ३० हजार शिक्षकांची भरती केली जाणार आहे तर दुसऱ्या टप्प्यात जवळपास २० हजार शिक्षकांची भरती केली जाईल. आधार वेरिफिकेशन विद्याथ्यांचे पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरती संदर्भात आकड़ा कळेल. शंभर टक्के शिक्षक भरती होणार आहे. त्यासाठी संच मान्यता झाली पाहिजे. कारण आरक्षणानुसार ही पद भरती होईल. या उमेदवारांच्या मुलाखती होऊन त्यांची भरती केली जाईल.

शिक्षकांच्या बदलीबाबत केसरकर म्हणाले….

शिक्षकांच्या बदलीसंदर्भात ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत भेट घेऊन चर्चा करणार आहे. माध्यमिक शिक्षकांनुसार प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या सुद्धा रद्द करता येतील का ? जेणेकरून शिक्षक स्थिर होतील, याबाबत महाजन यांच्यासोबत चर्चा केली जाईल. तसेच प्रत्येक शिक्षकाला आपल्या गावातच पोस्टिंग मिळेल असे नाही, मात्र जवळच्या गावात पोस्टिंग देता येईल. शिक्षकांची बदली झाली नाही तर एक जबाबदारीची जाणीव शिक्षकांमध्ये असते. एखादा शिक्षक अजिबात चांगला शिकवत नसेल तर त्याच्या संदर्भात वेगळे निर्णय घ्यावे लागतील. आतापर्यंतच्या शिक्षकांची शिक्षा म्हणून बदली करावी लागायची. आता बदली करता त्या शिक्षकांना ट्रेनिंग द्यावी लागेल, असे दीपक केसरकर म्हणाले.

एकच युनिफॉर्मबाबत विचार करू » विद्यार्थ्यांच्या एकच युनिफॉर्मबाबतचा निर्णय यावर्षी घ्यायचा की पुढल्या वर्षी घ्यायचा या संदर्भात एक ते दोन दिवसात विचार करा आणि त्यानंतर ठरवलं जाईल, असं दीपक केसरकर यांनी स्पष्ट केलं. ऑर्डर दिलेली नाही किंवा कुठल्याही प्रकारे पैसे ट्रान्सफर केलेले नाहीत. स्वतःचे अधिकार वापरून ज्यांनी आधीच युनिफॉर्मे संदर्भात ऑर्डर दिलेली आहेत त्यांनी बैठकीसाठी विचारणा केली आहे. यामध्ये महिला बचत गटांना काम मिळवून देण्याचे शासनाचे धोरण आहे. स्काऊट गाईड, एनएसएस हे कंपल्सरी करणार आहोत. त्यांना एक पर्टिक्युलर युनिफॉर्म दिला तर गणवेशाचा डबल खर्च होणार नाही. बूट सुद्धा आम्ही विद्याथ्र्यांना देणार आहोत..