मुंबई: ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाची राज्यातील सर्वसामान्य जनतेस माहिती व्हावी या हेतूने राज्य सरकारने महिनाभराच्या कालावधीत या उपक्रमाची वर्तमानपत्रे ,दूरचित्रवाहिन्या, रेडिओ तसेच समाजमाध्यमे तसेच नवमाध्यमे यांच्या माध्यमातून जाहिरात करण्यासाठी ५२ कोटी ९० लाख ८० हजार २४० रुपयांच्या खर्चास माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने वित्तीय व प्रशासकीय मान्यता दिली आहे.
नियोजन विभागाने सर्व शासकीय योजना लोकाभिमुख करून त्याची अंमलबजावणी गतिमान करण्यासाठी ‘जत्रा शासकीय योजनांची, सर्व सामान्यांच्या विकासाची’ हे अभियान राबविण्याचे निश्चित केले. नियोजन विभागाने या अभियानाचे नाव बदलून ते ‘शासन आपल्या दारी’ असे नवीन नाव दिले. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने सत्तेवर आल्यावर राज्यातील जनतेच्या हिताचे घेतलेले निर्णय जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी जाहिरातीच्या माध्यमातून महिनाभराच्या कालावधीत सरकारतर्फे माहिती व जनसंचालनालय विभाग प्रयत्न करणार आहे. यासाठी ५२ कोटी ९० लाख ८० हजार २४० रुपये इतक्या अंदाजे खर्चास वित्तीय आणि प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.