श्रीनगर – सीमारेषेवर पारंपारिक शत्रू राष्ट्र पाकिस्तानच्या कुरापती नेहमीच्याच असतात. भारतीय सैन्यदल देखील दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देत आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलाच्या मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. गेल्या ७२ तासांमध्ये राज्यात सुरक्षा दलाच्या जवानांनी १६ दहशतवाद्यांना ठार केले आहे.
शोपियानमध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये आजझालेल्या चकमकीदरम्यान सहा दहशतवाद्यांना यमसदनी पाठविण्यात जवानांना यश आले आहे. परिसरात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली असल्याने शोधमोहीम सुरू करण्यात आली होती. या चकमकीत लष्कराचा एक जवान जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.