चोपड्यात सकल मराठा समाजाचा भव्य मुख मोर्चा !

भुसावळ प्रतिनिधी l जालना जिल्ह्यातील अंतरवाली गावातील आंदोलनकर्त्यांवर पोलिसांनी प्रचंड लाठीमार व हवेत गोळीबार करण्यात आला होता. या घटनेच्या निषेधार्थ चोपडयात आज सकल मराठा समाजातर्फे भव्य मुख मोर्चा काढण्यात आला आहे. धरणगाव बायपास वर रस्ता रोको शांततेच्या मार्गाने करण्यात आले. कोणत्याही प्रकारची घोषणा न करता शांततेत मूक मोर्चा पार पाडण्यात आला. यावेळी शहर पोलीस निरीक्षक के के पाटील यांनी चौक बंदोबस्त ठेवलेला होता. मूक मोर्चा 20 ते 25 मिनिटासाठी रस्ता रोको करण्यात आला.तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांना महिलांनी निवेदन दिले व शहर पोलीस निरीक्षक के के पाटील यांना शाळकरी मुलांतर्फे निवेदन देण्यात आले.

निवेदन देताना असे सांगण्यात आले की जालन्यात घटना घडली आहे त्या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई लवकरात लवकर व्हावी असे निवेदनाद्वारे दोघं अधिकाऱ्यांना सांगन्यात आले यावेळी मूक मोर्चा मध्ये सहभाग घेणाऱ्या मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. माजी आमदार दिलीप सोनवणे, चोसकाचे माजी चेअरमन ऍड घनश्याम अण्णा पाटील, जि.प.चे माजी सभापती गोरख छन् पाटिल आधी मराठा समाजाचे मान्यवर धरणगाव बायपास येथे मूक मोर्चा मध्ये उपस्थित होते..