जळगाव: : युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेला आजपासून सुरुवात होणार आहे. जळगाव जिल्ह्यातून जनआशीर्वाद यात्रेचा प्रारंभ होत आहे. दरम्यान ते जळगावात दाखल झाले आहे. सकाळी जळगाव विमानतळावर त्यांचे आगमन झाले. त्यानंतर तेथून खाजगी वाहनाने ते शहरात दाखल झाले. पुढे ते पाचोरा येथे जाणार आहे.
आदित्य ठाकरे यांची जन आशीर्वाद यात्रा सहा टप्प्यांत पार पडणार आहे. या यात्रेचा पहिला टप्पा आजपासून जळगावातून सुरू होणार आहे. या अंतर्गत ते जळगावमध्ये संवाद साधणार आहेत. त्यानंतर १९ तारखेला धुळे-मालेगाव, २० तारखेला नाशिक शहर, २१ तारखेला नाशिक ग्रामीण, अहमदनगर आणि २२ तारखेला अहमदनगर, श्रीरामपूर आणि शिर्डी येथील जनतेशी संवाद साधणार आहेत.