जम्मू-काश्मीर पुनर्रचना विधेयक लोकसभेत सादर; जोरदार चर्चा

0

नवी दिल्ली: काल सोमवारी केंद्रातील मोदी सरकारने ऐतिहासिक निर्णय घेतला. जम्मू-काश्मीरला स्वतंत्र राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० रद्द करत जम्मू-काश्मीर आणि लद्दाक हे दोन केंद्रशासित प्रदेश निर्माण केले. राज्यसभेत जम्मू-काश्मीर पुनर्रचना विधेयक काल १२५ विरुद्ध ६१ असे मंजूर झाले. दरम्यान आज लोकसभेत हे विधेयक सादर करण्यात आले आहे. यावर लोकसभेत जोरदार चर्चा सुरु आहे. कॉंग्रेस खासदारांनी या विधेयकावरील चर्चेत भाग घेत जोरदार विरोध केला आहे. कॉंग्रेस नेते मनीष तिवारी यांनी कलम ३७० रद्द करणे असंवैधानिक असल्याचे सांगितले.