नवी दिल्ली- केंद्र सरकारने अरुणाचलमधील तीन जिल्ह्यांना सशस्त्र दल विशेषाधिकार कायदा (अफस्पा) जाहीर करण्यात आले आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने काल बुधवारी अधिसूचना जारी केली आहे. अधिसूचनेत तिरप, चांगलांग आणि लोंगडिंग जिल्ह्यांना अशांत घोषित केले आहे. अरुणाचल आणि आसाम सीमेवर असलेल्या 8 पोलीस स्टेशनांच्या अंतर्गत येणा-या काही भागालाही संवेदनशील जाहीर केले आहे.
तिरप, चांगलांग, लोंगडिंग जिल्ह्ये आणि आसाम सीमेवरून 8 पोलीस स्टेशनांतर्गत येणा-या भागाला संवेदनशील घोषित केले आहे. या तिन्ही जिल्ह्यांत 1958 चे कलम 3 अंतर्गत केंद्र सरकारने 31 मार्च 2019पर्यंत अफस्पा लागू केला आहे. 1 ऑक्टोबर 2018पासून अफस्पा लागू झाला आहे, असं केंद्र सरकारनं काढलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे.
तत्पूर्वी आसामचे गव्हर्नर जगदीश मुखी यांनी 3 ऑगस्ट रोजी राज्यात अफस्पा पुढच्या सहा महिन्यांसाठी वाढवत असल्याची घोषणा केली होती. अफस्पा या अॅक्टअंतर्गत संवेदनशील क्षेत्रात सुरक्षा जवानांना विशेषाधिकार बहाल केले जातात. या अॅक्टअंतर्गत सशस्त्र दलाला चौकशी करणे, अटक करणे आणि बळाच्या वापरासाठी जास्त स्वातंत्र्यता दिली जाते.