आनंदाच्या क्षणी मृत्यूने गाठले

0

नाशिक : नाशिक-मुंबई प्रवाश्यांसाठी पंचवटी एक्स्प्रेस सुरु व्हावे यासाठी आयुष्यभर खस्ता खाणाऱ्या बिपीन गांधी यांना आज नवीन पंचवटी एक्स्प्रेच्या येण्याच्या आनंदानं नाशिकच्या प्लटफॉर्मवर हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांच्या मृत्यू झाला. रेल प्रवासी संघटनेचा आजचा आनंदी दिवस होता. मात्र, गांधी यांच्या मृत्यूने आनंदी वातावरण विरजण पडले आहे. ज्यांनी आयुष्यभर या गाडीसाठी प्रयत्न केले आणि त्याच गाडीत त्यांचे प्राण गेल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

नाशिक जिल्ह्याची जीवनवाहीनी समजल्या जाणाऱ्या मनमाड -छत्रपती शिवाजी टर्मिनस पंचवटी एक्सप्रेस आजपासून अत्याधुनिक रुपात प्रवाशी सेवेत रुजू झाली आहे. एअर टँक, एअर डिस्क ब्रेक तंत्रज्ञान वापरून या पंचवटीचे नवीन कोच डिजाईन आले आहे. आजपासून नाशिक मनमाड नवीन एक्स्प्रेचा आनंद मिळणार आहे. मात्र बिपीन गांधी यांच्या अचानक जाण्याने रेल्वेतील आनंदी वातावरण दु:खात झाले.

या गाडीसाठी अपार मेहनत घेणाऱ्या बिपीन गांधी यांनी रेल्वे मंत्रालयाला भंडावून सोडणाऱ्याआणि शेकडो पत्र पाठविणाऱ्यया रेल परिषदेच्या संस्थापकाने पंचवटी एक्स्प्रेसची बोगी आपल्या कामाने विमानाप्रमाणे असावी, अशी बनविली होती. बोगीत मेडिटेशन, रेल्वे होस्टेस ,बाहेरील खाद्य पदार्थाना बंदी ,कचरामुक्त डबा असे अनेक विविध उपक्रम ते राबवित असत इतकेच नाही तर या बोगीचा वाढदिवस दरवर्षी ते साजरा करत असत.