मुंबईच्या खेळाडूंवर बीसीसीआय नेहमी अन्याय करते; सुनील गावस्कर यांची उघड नाराजी

0

मुंबई-बीसीसीआय संघ निवड प्रक्रिया नेहमीप्रमाणे वादात अडकली आहे. अनकेदा निवड समितीच्या निर्णयांवर नाराजी व्यक्त केली जाते. भारताचे माजी क्रिकेटर सुनील गावसकर यांनी बीसीसीआयच्या संघ निवड प्रक्रियेवर टीका केली आहे. बीसीसीआय मुंबईच्या खेळाडूंना नेहमीच सापत्न वागणूक देत असल्याचा आरोप गावसकर यांनी केला आहे. मुंबईच्या सिद्धेश लाडची बाजू मांडताना गावसकर यांनी अमोल मुजुमदारवर झालेल्या अन्यायाला वाचा फोडली.

स्थानिक क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करूनही सिद्धेश लाडला भारत ‘अ’ संघात स्थान देण्यात आले नाही. यावर गावसकर यांनी नाराजी प्रकट केली आहे. अमोल मुझुमदार सारखी सिद्धेश कारकीर्द संपू नये अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.

अन्य राज्यातील खेळाडूकडे एकदोन सामन्याचा अनुभव असूनही त्याला भारत ‘अ’ संघात स्थान मिळते. प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये धावांचा शिखर उभारणाऱ्या मुझुमदारवर अन्याय झाला. आशा करतो सिद्धेशच्या बाबतीत तसे घडू नये,” असेही गावसकर यांनी नमूद केले. सिद्धेशने ४३.३९ च्या सरासरीने धावा केल्या आहेत. प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर सहा शतक आणि २१ अर्धशतक आहेत. मुझुमदारने १७१ प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ३० शतक आणि ५० अर्धशतकांसह ११,१६७ धावा केल्या आहेत.