निवडणुकांपूर्वी देशात विरोधकांच्या एकजुटीसाठी प्रयत्न करणार
राजीनाम्यानंतर शरद पवार बारामतीत दाखल, केंद्रीय राजकारणात लक्ष घालण्याचे सूतोवाच : पत्रकारांशी संवाद
पुणे l
राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांनी आपल्या पक्षांतर्गत तिढा आता संपला आहे. त्यामुळे येत्या काळात निवडणुकांना समोरे जाण्याआधी देशातील एकजुटीला सहकार्य करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन शरद पवारांनी केले. राजीनामा मागे घेतल्यानंतर शरद पवार बारामतीत दाखल झाले आहेत. शनिवारी त्यांनी बारामतीहून पत्रकारांशी संवाद साधला.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अध्यक्षपदावरून निवृत्तीची घोषणा केली होती. परंतु, या निर्णयाला पक्षातील नेते, पदाधिकारी आणि कार्यकत्यांनी कठोर विरोध केला. अनेकांनी उपोषण केले. त्यांनी शरद पवार बारामतीत दाखल, आपला राजीनामा मागे घ्यावा, याकरता कार्यकर्ते हट्टाला पेटले होते. तसंच देशपातळीवर अनेक नेत्यांनीही राजीनामा मागे घेण्याची विनंती केली करण्यासाठी शरद पवारच नेतृत्त्व करू शकतील, असं म्हटलं जात होतं. विरोधकांच्या एकजुटीसाठी शरद पवार राष्ट्रवादीचे अध्यक्ष राहणे गरजेचे आहे, असाही सूर लावण्यात आला होता. अखेर सर्वांच्या विनंतीनंतर शरद पवारांनी आपला राजीनामा मागे घेतला आहे. दरम्यान, आता पुढची रणनीती काय असणार याकडे सर्वांचं लक्ष लागले होते. पक्षाच्या अध्यक्षपदी पुनर्नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी केंद्रपातळीवर लक्ष द्यायला सुरुवात केली आहे. आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी विरोधकांच्या एकजुटीसाठी प्रयत्न करणार असल्याचे म्हटले आहे.
सरकार विरोधात पवार मोट बांधणार » येत्या १०-११ महिन्यांनंतर सर्वत्र निवडणुकांचा माहोल सुरू होईल, त्या काळात इतर प्रश्न बाजूला राहतात आणि निवडणुका अग्रस्थानी येतात, असे शरद पवार म्हणाले, नितिश कुमार, अरविंद केजरीवाल, के. चंद्रशेखरराव, ममता बॅनर्जीसह अनेक नेते विरोधकांच्या एकजुटीसाठी प्रयत्न करत आहेत. कॉमन मिनिमम प्रोग्रॅम तयार करून विरोधकांना एकत्रित आणण्यासाठी माझा सहभाग असेल, असंही शरद पवार म्हणाले. म्हणजेच, केंद्र पातळीवर मोदी सरकारविरोधात विरोधकांची मोट बांधण्याकरता शरद पवार पुन्हा महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत, हे स्पष्ट झाले आहे.
पवारांच्या राजीनाम्यासाठी देव पाण्यात
शरद पवारांनी राजीनामा द्यावा, यासाठी अनेकजण देव पाण्यात ठेऊन बसले होते, असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलं आहे. जयंत पाटील यांचा रोख कोणाकडे होता, हे कळले नाही. एका सभेत बोलताना जयंत पाटलांनी म्हटले, शरद पवारांच्या राजीनाम्याने वादळ निर्माण झालं होते. लोक देव पाण्यात ठेऊन बसले होते. जे होत आहे, ते व्हावं अशी त्यांची इच्छा होती. पण, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवारांच्या नेतृत्वाखाली एकसंघ आहे. शरद पवार नसते, तर अनेक प्रश्न निर्माण झाले असते. मात्र, ही शक्यता आता मावळली आहे.