भरारी पथक उरले फक्त नावापुरते ; जिल्हात एकही कारवाई नाही
जिल्ह्यात एकाही विद्यार्थ्यांवर कारवाई नाही.
जळगाव । चिन्मय जगताप । पाच मार्च पासून राज्यासह जिल्ह्यात बारावीच्या बोर्डाच्या पेपरला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात सर्रासपणे कॉप्या सुरू असल्याची बातमी दर दोन दिवसांनी कानावर पडत आहे. बारावीचे चार पेपर पूर्ण होऊनही जळगाव जिल्ह्यातील भरारी पथकाला संपूर्ण जिल्ह्यात एकही कॉपी करणारा विद्यार्थी शोधता आला नाहीये. यामुळे भरारी पथक केवळ नावापुरतेच उरले की काय? असा प्रश्न सर्वसामान्य जनतेतून उपस्थित केला जात आहे.
माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाकडून दरवर्षी बोर्डाच्या परीक्षेवेळी भरारी पथकाचे नियोजन करण्यात येते. परीक्षेवेळी कोणताही गैरप्रकार होऊ नये यासाठी या भरारी पथकाचे नियोजन केले जाते. मात्र जळगाव जिल्ह्यातील भरारी पथक हे केवळ नावापुरते उरले असून त्यांना जळगाव जिल्ह्यात एकही कॉपी करणारा विद्यार्थी आढळून आला नाहीये.
जिल्ह्यात परीक्षे वेळी सर्वत्र सर्रासपणे कॉपी सुरू असल्याच्या बातम्या वर्तमानपत्रांमधून दाखवल्या जात आहेत. जिल्ह्यातील सर्वच वर्तमानपत्र या कॉप्यांसंदर्भात बातम्या प्रकाशित करत आहेत. व टोप्या सुरू असल्याचे धडधडीत फोटो प्रकाशित करत आहेत. मात्र अ भरारी पथकाला त्यांच्या कामाबाबत कोणतेही गांभीर्य राहिले नसून बारावीच्या पेपर वेळेस कुठेही अनुचित प्रकार घडला नाही असे त्यांचे म्हणणे आहे.
बुधवारी दहावीचा पहिला पेपर झाला. यावेळी मोठ्या प्रमाणात कॉप्या होत असल्याचे निदर्शनास आले. मात्र भरारी पथकाला कुठेही कॉपी सुरू आहे हे दिसले नाही. दहावीचा पहिला पेपर ला सुद्धा कॉपी करणाऱ्या एकाही विद्यार्थ्याला भरारी पथक पकडू शकले नाही.