BREAKING: अखेर जनतेतून सरपंच निवड रद्द; मंत्रिमंडळाची मान्यता !

0

मुंबई: फडणवीस सरकारच्या काळात घेतलेल्या अनेक निर्णयाला महाविकास आघाडीच्या सरकारकडून स्थगिती देण्यात येत आहे. थेट जनतेतून नगराध्यक्ष निवड रद्द केल्यानंतर आता सरपंच निवडही रद्द करण्यात आली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा मोठा निर्णय घेतला आहे. आता ग्रामपंचायत सदस्यांतून सरपंच निवडला जाणार आहे. ग्रामपंचायतीच्या सरपंच थेट जनतेतून निवडण्याचा कायदा मागील सरकारने केला होता, परंतु या सरकारने तो कायदा रद्द केला आहे. मात्र ‘सरपंच जनतेतूनच निवडला जावा’ अशी महाराष्ट्र राज्य सरपंच संघटनेची मागणी आहे. त्यामुळे सरकार रद्द करत असलेल्या निर्णयाला सरपंच संघटनेने विरोध केला आहे. सरकारने हा निर्णय रद्द करू नये यासाठी सरपंच परिषदेने आंदोलन सुरू केले असून, आजच शेवगाव (जि. नगर ) येथे सरपंच परिषदेतर्फे तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता.जनतेतून सरपंच निवडणे रद्द केल्यास सरकारला जागा दाखवू असा इशारा देण्यात आला होता.